शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

हालचाली मंदच; विधानसभेचा परिणाम

By admin | Updated: September 30, 2014 23:08 IST

हालचाली मंदच; विधानसभेचा परिणाम

जिल्हा परिषद सभापती निवडणूकनाशिक : अवघ्या ७२ तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात शांतता दिसत असून, या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सावट आले आहे. सर्वच इच्छुक आपापल्या मतदारसंघात पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींची निवड येत्या शनिवारी (दि. ४) होत असून, निवडणुकीसाठीचे माहिती वजा सभेचा अजेंडा सर्वच सदस्यांना पोहोच झाला आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कॉँग्रेसच्या गोटात कमालीचे नैराश्य आले असून, आता कोणतीही समिती घ्यायची नाही, तटस्थ राहायचे इतपत कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता झाल्याचे, तर सर्व आयतेच चालत आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांचे लॉबिंगही सुरू झाले आहे. शिवसेना तटस्थ राहिल्यास आणि कॉँग्रेसची एकूण भूमिका पाहता राष्ट्रवादीलाच पुन्हा चारही विषय समिती सभापतिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या एका मतप्रवाहानुसार राष्ट्रवादीने शिवसेनेला किंवा भाजपा व माकपाला सोबत घेऊन दोन-दोेन समित्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून रवींद्र देवरे, शैलेश सूर्यवंशी, यतिन पगार, गोरख बोडके, बाळासाहेब गुंड, प्रवीण गायकवाड, इंदुमती खोसकर, संगीता ढगे, उषा बच्छाव आदि इच्छुक आहेत, तर शिवसेनेकडून प्रवीण जाधव, बंडू गांगुर्डे, भाजपाकडून केदा अहेर इच्छुक आहेत. शिवसेना आणि कॉँग्रेसची काय भूमिका राहते यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष असून, खऱ्या घडामोडी शुक्रवारी (दि. ३) दसऱ्याच्या दिवशीच होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)वीजपंप नादुरूस्तीमुळेपाणीपुरवठ्यावर परिणामयेवला : पिंपळखुटे तिसरे ग्रामपंचायतीचा विद्युतपंप नादुरूस्त असून, गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांनी तातडीने वीजपंपाची दुरूस्ती करून नागरिकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)पन्हाळसाठे -पिंपळखुटे तिसरे ग्रुपग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजनेचावीजपंप ८ महिन्यांपासून बंद आहे. विहिरीत पुरेसा पाणीसाठा असूनही वीजपंपनादुरुस्त असल्याने गावाला पाणीपुरवठा करता येत नाही.सरपंच व ग्रामसेवकयांचेकडे वारवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उपसरपंचराधाबाई बोडके यांचे सह सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे. या वीजपंपदुरु स्ती साठी केवळ ७५० रु पये दुरु स्ती खर्च व २०० फुट वायरची गरज आहे.