शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महावितरण कार्यालयाबाहेर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST

नाशिक : हिंगणवेढे परिसरात महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकरोड येथील महावितरणच्या विद्युत भवनावर मोर्चा काढून निवेदन दिले.

 

नाशिक : हिंगणवेढे परिसरात महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकरोड येथील महावितरणच्या विद्युत भवनावर मोर्चा काढून निवेदन दिले.महावितरण अर्बन दोनचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, हिंगणवेढे परिसरात कुठलीही पूर्वसूचना न देता दोन-तीन महिन्यांपासून वारंवार अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे हाल होत असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील जनावरांचा चारा जळून गेला आहे. हिंगणवेढे परिसरात लाइनमन येत नसल्याने नवीन लाइनमनची नेमणूक करावी. गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे हिंगणवेढे व आजूबाजूच्या परिसरात जवळपास ५० हून अधिक विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते. त्याचे दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने काही भागातील वीजपुरवठा अजूनही खंडितच आहे. विद्युत खांब उभारणीचे काम संबंधित ठेकेदाराकडून योग्यरीत्या होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. भारनियमन व इतर प्रश्न त्वरित न सोडविल्यास नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर कार्यकारी अभियंता सायनेरकर यांनी लागलीच महावितरणचे एक पथक हिंगणवेढे येथे पाहणीसाठी पाठविले. निवेदनावर गंगाधर धात्रक, वाल्मीक धात्रक, संपत धात्रक, दीपक धात्रक, संजय वाघ, बारकू धात्रक, रमेश धात्रक आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)