शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

आंदोलन : दादा भुसे यांचा वीज वितरणच्या कार्यालयात ठिय्या

By admin | Updated: October 31, 2014 22:47 IST

रोहित्रांअभावी ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रे गेल्या दीड महिन्यांपासून बंद पडल्यामुळे तालुक्यातील जनतेचे विजेविना प्रचंड हाल होत आहेत. त्याकडे वीज कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी व सदर वीजपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आमदार दादा भुसे यांनी येथील नवीन बसस्थानकालगतच्या वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वीज कंपनीकडून रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अडीच तासांनी सदर आंदोलनमागे घेण्यात आले.मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा सर्वाधिक दूष्परिणाम ग्रामीण भागातील जनतेवर व शेतकऱ्यांवर होत आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या मनमानी पध्दतीमुळे जनतेच्या त्रासात अधिकच भर पडत आहे. तालुक्यातील सायने बु., शेजवाळ, टोकडे, करंजगव्हाण, हाताणे, दहिवाळ, गिगाव, कजवाडे आदि गाव परिसरांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून विद्युत रोहित्र जळाले आहेत. इतर काही ठिकाणी दिवसाआड रोहित्र जळण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने मालेगाव वीज कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांनी केराच्या टोपल्या दाखविल्या. त्यामुळे संबंधित ग्रामीण जनता व शेतकऱ्यांमध्ये वीज कंपनीविषयी प्रचंड संताप आहे. याची दखल घेत आमदार भुसे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. संबंधित रोहित्र जळाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जात आहे. त्यामुळे त्यापुढील कार्यवाहीस त्याप्रमाणात उशिर केला जात आहे. तसेच जळालेले रोहित्र दुरुस्त करून बसविल्यानंतर पुन्हा तासा दोन तासात ते पुन्हा जळून बंद पडत आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ व शेतकरी पूर्णत: हवालदिल होत आहेत. तालुक्यात दहा खासगी कंपन्या रोहित्र पुरवठा व दुरुस्ती करतात. तरीही रोहित्रांचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. मात्र शहरातील काही ठिकाणी रोहित्र जळाल्यास ते त्वरित बदलण्यात येते. त्यामुळे वीज कंपनीकडून शहरी व ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचा व त्यात आर्थिक हितसंबंध दडला असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी याप्रसंगी केला. ग्रामीण भागात दिवसा वीज भारनियमन करण्यात येऊन रात्रीचा वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र रात्रीच्या वेळी शेतीकामे करण्यात मोठ्या अडचणी येतात. साप - विंचू यांची भीती असते. काही ठिंकाणी सर्पदंशाच्या तर काही ठिकाणी विहिरीत शेतकरी पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजरी, मका, कापूस, कांदा या पिकांचे नुकसान होत आहे. नाशिक विभागात सर्वात जास्त वसुली मालेगावची असून, देखील येथे वीजपुरवठ्याच्या समस्या कायम निर्माण होत असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी केला. यासंदर्भात वीजकंपनीचे अधिकारी एस. एस. आडे यांना आमदार भुसे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात अधिकारी आडे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्वरित २५ रोहित्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास अडीच तास चाललेले सदर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे सभापती धर्मराज पवार, प्रमोद शुक्ला, चंदनपुरीचे सरपंच राजेंद्र पाटील, विनोद वाघ, श्रीरामा मिस्तरी यांच्यासह शिवसैनिक व तालुक्यातील शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)