शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन : दादा भुसे यांचा वीज वितरणच्या कार्यालयात ठिय्या

By admin | Updated: October 31, 2014 22:47 IST

रोहित्रांअभावी ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रे गेल्या दीड महिन्यांपासून बंद पडल्यामुळे तालुक्यातील जनतेचे विजेविना प्रचंड हाल होत आहेत. त्याकडे वीज कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी व सदर वीजपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आमदार दादा भुसे यांनी येथील नवीन बसस्थानकालगतच्या वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वीज कंपनीकडून रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अडीच तासांनी सदर आंदोलनमागे घेण्यात आले.मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा सर्वाधिक दूष्परिणाम ग्रामीण भागातील जनतेवर व शेतकऱ्यांवर होत आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या मनमानी पध्दतीमुळे जनतेच्या त्रासात अधिकच भर पडत आहे. तालुक्यातील सायने बु., शेजवाळ, टोकडे, करंजगव्हाण, हाताणे, दहिवाळ, गिगाव, कजवाडे आदि गाव परिसरांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून विद्युत रोहित्र जळाले आहेत. इतर काही ठिकाणी दिवसाआड रोहित्र जळण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने मालेगाव वीज कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांनी केराच्या टोपल्या दाखविल्या. त्यामुळे संबंधित ग्रामीण जनता व शेतकऱ्यांमध्ये वीज कंपनीविषयी प्रचंड संताप आहे. याची दखल घेत आमदार भुसे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. संबंधित रोहित्र जळाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जात आहे. त्यामुळे त्यापुढील कार्यवाहीस त्याप्रमाणात उशिर केला जात आहे. तसेच जळालेले रोहित्र दुरुस्त करून बसविल्यानंतर पुन्हा तासा दोन तासात ते पुन्हा जळून बंद पडत आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ व शेतकरी पूर्णत: हवालदिल होत आहेत. तालुक्यात दहा खासगी कंपन्या रोहित्र पुरवठा व दुरुस्ती करतात. तरीही रोहित्रांचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. मात्र शहरातील काही ठिकाणी रोहित्र जळाल्यास ते त्वरित बदलण्यात येते. त्यामुळे वीज कंपनीकडून शहरी व ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचा व त्यात आर्थिक हितसंबंध दडला असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी याप्रसंगी केला. ग्रामीण भागात दिवसा वीज भारनियमन करण्यात येऊन रात्रीचा वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र रात्रीच्या वेळी शेतीकामे करण्यात मोठ्या अडचणी येतात. साप - विंचू यांची भीती असते. काही ठिंकाणी सर्पदंशाच्या तर काही ठिकाणी विहिरीत शेतकरी पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजरी, मका, कापूस, कांदा या पिकांचे नुकसान होत आहे. नाशिक विभागात सर्वात जास्त वसुली मालेगावची असून, देखील येथे वीजपुरवठ्याच्या समस्या कायम निर्माण होत असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी केला. यासंदर्भात वीजकंपनीचे अधिकारी एस. एस. आडे यांना आमदार भुसे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात अधिकारी आडे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्वरित २५ रोहित्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास अडीच तास चाललेले सदर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे सभापती धर्मराज पवार, प्रमोद शुक्ला, चंदनपुरीचे सरपंच राजेंद्र पाटील, विनोद वाघ, श्रीरामा मिस्तरी यांच्यासह शिवसैनिक व तालुक्यातील शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)