शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST

प्रकल्पग्रस्तांच्या कश्यपी धरणात उड्या

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांना मोबदला व शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या प्रश्नावरून सोमवारी दुपारी धरणावर तीव्र आंदोलन करण्यात आले. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असतानाच दहा ते बारा तरुणांनी थेट पाण्याने गच्च भरलेल्या धरणातच जलसमाधी घेण्यासाठी उड्या मारल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी संतप्त जमावाने शासकीय अधिकाऱ्यांची वाहने उलथविण्याचे तसेच हवा काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला आणि कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पाठपुरावा करीत असून, अनेक वेळा उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलनही करण्यात आले. परंतु आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर थेट धरणाच्या पाण्यातच जलसमाधी घेण्याचे आंदोलन छेडण्यात आले. सकाळपासूनच धरणाला लागून असलेल्या कश्यपीनगरात परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला होता. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी धाव घेऊन त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. धरणाला लागूनच ही बैठक सुरू असताना अचानक एकनाथ बेंडकुळी, भगवान खाडे, सोमनाथ मोंढे अशा दहा ते बारा प्रकल्पग्रस्त तरुणांनी धरणावर धावत जाऊन थेट पाण्यात उड्या मारल्या. या घटनेमुळे बैठकीचा नूरच बदलून गेला. अचानक तणाव वाढून ज्यांनी पाण्यात उड्या मारल्या त्या तरुणांच्या नातेवाइकांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ अख्खा गावही धरणाकडे पळाल्याने त्यांच्या अटकावासाठी पोलीस बळही अपुरे पडले. कश्यपी धरण सध्या ९० टक्के भरले असून, पाण्यात उड्या मारणाऱ्या तरुणांचा जीव धोक्यात पडल्याचे पाहून जीवरक्षक दल तसेच गावातीलच काही तरुणांनीच पाण्यात उड्या घेत, जलसमाधी घेऊ पाहणाऱ्यांना बाहेर काढले. यातील सोमनाथ मोंढे या तरुणाला पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेने बिथरलेल्या ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्यावरच चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने उलथवून टाकण्यासाठी जमाव प्रयत्नशील होताच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता गृहीत धरून आणखी पोलीस बळ मागविण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात आंदोलकांनी काही शासकीय वाहनांची हवाही सोडून दिली. दुपारी दोन वाजेपासून सुरू असलेला हा गोंधळ वाढत गेला. प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे हिरामण खोसकर यांचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या या जमावाला कसेबसे शांत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याचे व तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)