शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST

प्रकल्पग्रस्तांच्या कश्यपी धरणात उड्या

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांना मोबदला व शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या प्रश्नावरून सोमवारी दुपारी धरणावर तीव्र आंदोलन करण्यात आले. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असतानाच दहा ते बारा तरुणांनी थेट पाण्याने गच्च भरलेल्या धरणातच जलसमाधी घेण्यासाठी उड्या मारल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी संतप्त जमावाने शासकीय अधिकाऱ्यांची वाहने उलथविण्याचे तसेच हवा काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला आणि कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पाठपुरावा करीत असून, अनेक वेळा उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलनही करण्यात आले. परंतु आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर थेट धरणाच्या पाण्यातच जलसमाधी घेण्याचे आंदोलन छेडण्यात आले. सकाळपासूनच धरणाला लागून असलेल्या कश्यपीनगरात परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला होता. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी धाव घेऊन त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. धरणाला लागूनच ही बैठक सुरू असताना अचानक एकनाथ बेंडकुळी, भगवान खाडे, सोमनाथ मोंढे अशा दहा ते बारा प्रकल्पग्रस्त तरुणांनी धरणावर धावत जाऊन थेट पाण्यात उड्या मारल्या. या घटनेमुळे बैठकीचा नूरच बदलून गेला. अचानक तणाव वाढून ज्यांनी पाण्यात उड्या मारल्या त्या तरुणांच्या नातेवाइकांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ अख्खा गावही धरणाकडे पळाल्याने त्यांच्या अटकावासाठी पोलीस बळही अपुरे पडले. कश्यपी धरण सध्या ९० टक्के भरले असून, पाण्यात उड्या मारणाऱ्या तरुणांचा जीव धोक्यात पडल्याचे पाहून जीवरक्षक दल तसेच गावातीलच काही तरुणांनीच पाण्यात उड्या घेत, जलसमाधी घेऊ पाहणाऱ्यांना बाहेर काढले. यातील सोमनाथ मोंढे या तरुणाला पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेने बिथरलेल्या ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्यावरच चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने उलथवून टाकण्यासाठी जमाव प्रयत्नशील होताच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता गृहीत धरून आणखी पोलीस बळ मागविण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात आंदोलकांनी काही शासकीय वाहनांची हवाही सोडून दिली. दुपारी दोन वाजेपासून सुरू असलेला हा गोंधळ वाढत गेला. प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे हिरामण खोसकर यांचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या या जमावाला कसेबसे शांत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याचे व तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)