शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेतकऱ्यांचे वीज उपकेंद्रात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 9, 2016 00:34 IST

वडांगळी : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मागण्यांचे निवेदन

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी वीज उपकेंद्रातून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आठ पैकी केवळ चार तास वीजपुरवठा सुरूराहत असल्याने शेतकऱ्यांनी वडांगळी वीज उपकेंद्रात सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. वडांगळी वीज उपकेंद्रावरील सर्व फिडरवरून सुरळीत विद्युत पुरवठा करण्याबाबतचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी सिन्नर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. इंगळे, वडांगळी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता एम. पी. खर्जे यांना दिले. वडांगळी फिडरवर प्रमाणापेक्षा जास्त विद्युतभार वाढला आहे. खडांगळी फिडरवर पिंपळगावचा अतिरिक्त भार वाढला आहे. त्यामुळे एकही फिडरवरुन वीज सुरळीत चालत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुसळगावहून वडांगळीला येणारी ३३ केव्हीची वाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहे. सदरील वाहिनीवरील चार उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जात असल्याने भार वाढत आहे. त्याकरिता सदर वाहिनी नव्याने टाकण्यात यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अडचणी दूर करून आठ तास थ्रीफेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून न्याय मागण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे व्ही. डी. इंगळे यांनी सांगितले. भार कमी करण्यासाठी पाच उपकेंद्रापैंकी मुसळगाव व निमगाव-सिन्नर उपकेंद्र वेगळे करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. मुसळगाव उपकेंद्र लवकरच वेगळे होईल, असे ते म्हणाले. तर निमगाव-सिन्नर उपकेंद्र म्हाळसाकोरे उपकेंद्रावर जोडण्यात येणार असल्याचे आश्वासन सांगितले. वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे लेखी आश्वासन इंगळे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुदेश खुळे, कडवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सतिष कोकाटे, कचरु खुळे, भास्कर चव्हाणके, अशोक चव्हाणके, किरण खुळे, दत्तात्रय खुळे, बाळासाहेब खुळे, उत्तम खुळे, माधव खुळे, दिनकर कोकाटे, सुनील गिते, दीपक अढांगळे, दत्तात्रय भोकनळ, अविनाश खुळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)