शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

मोदी सरकारविरोधात आंदोलन

By admin | Updated: May 26, 2017 00:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर येण्यापूर्वी गोरगरीब जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन न पाळलेल्या भाजपा सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊन २६ मे रोजी तीन वर्षे होत असून, त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत आल्यास १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, अशी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात अद्याप भारतात कोणताही काळा पैसा आला नाही की कोणाच्याही खात्यावर १५ लाख रुपये जमा झालेले नाहीत. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच आहेत. शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला कर्जमाफी दिली जात नसल्याने रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समृद्धी महामार्गाला जमिनी घेऊन लोकांना उघड्यावर पाडण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. कायदा व व्यवस्था मोडीत निघाली असून, आतापर्यंत १२५ निरपराध जणांचे खून झाले आहेत. कॉँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात असलेले ‘सच्चे दिन’ संपुष्टात आणून भाजपा सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून फसविल्याचा आरोप कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ते नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक वत्सलाताई खैरे, आशा तडवी, जॉय कांबळे यांच्यासह लक्ष्मण जायभावे, पंडित येलमामे, बबलू खैरे, उद्धव पवार, उमाकांत गवळी, मीराताई साबळे, गोपाळ जगताप, नितीन काकड, वसंत ठाकूर, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.