शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

मोदी सरकारविरोधात आंदोलन

By admin | Updated: May 26, 2017 00:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर येण्यापूर्वी गोरगरीब जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन न पाळलेल्या भाजपा सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊन २६ मे रोजी तीन वर्षे होत असून, त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत आल्यास १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, अशी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात अद्याप भारतात कोणताही काळा पैसा आला नाही की कोणाच्याही खात्यावर १५ लाख रुपये जमा झालेले नाहीत. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच आहेत. शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला कर्जमाफी दिली जात नसल्याने रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समृद्धी महामार्गाला जमिनी घेऊन लोकांना उघड्यावर पाडण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. कायदा व व्यवस्था मोडीत निघाली असून, आतापर्यंत १२५ निरपराध जणांचे खून झाले आहेत. कॉँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात असलेले ‘सच्चे दिन’ संपुष्टात आणून भाजपा सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून फसविल्याचा आरोप कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ते नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक वत्सलाताई खैरे, आशा तडवी, जॉय कांबळे यांच्यासह लक्ष्मण जायभावे, पंडित येलमामे, बबलू खैरे, उद्धव पवार, उमाकांत गवळी, मीराताई साबळे, गोपाळ जगताप, नितीन काकड, वसंत ठाकूर, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.