शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्यात अडचणींचा डोंगर

By admin | Updated: September 22, 2016 01:27 IST

स्मार्ट सिटी : कंपनीच्या पहिल्याच बैठकीत अंमलबजावणीबाबत संभ्रम

नाशिक : केंद्र सरकारने नाशिकची ‘स्मार्ट सिटी’ योजनेत निवड केल्याचा आनंद एकीकडे व्यक्त केला जात असतानाच स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या पहिल्याच बैठकीत एकूणच आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत अडचणींचा डोंगर उभा राहून संभ्रमावस्था निर्माण झाली. यावेळी झालेल्या चर्चेत गावठाण पुनर्वसनापासून ते ग्रीन फिल्ड विकसित करण्यापर्यंत अनेक त्रुटी समोर आल्या. आराखड्याविषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवर निघालेल्या शंका-कुशंका पाहून खुद्द कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे हेदेखील अचंबित झाले. अखेर कुंटे यांना सदर आराखडा अंतिम नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची पहिली बैठक राजीव गांधी भवनमध्ये आयुक्तांच्या दालनात कंपनीचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कंपनीसंदर्भात तयार करण्यात येणारे दस्तावेज, बॅँक खाती उघडणे, संचालक मंडळाची रचना, कर्मचारी उपलब्धता आदि तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर क्रिसिलच्या प्रतिनिधींनी स्मार्ट सिटीसाठी तयार केलेला २१९४ कोटी रुपयांचा आराखडा कंपनीच्या संचालक मंडळासमोर सादर केला. यावेळी हनुमानवाडी येथे ग्रीन फिल्ड अंतर्गत विकास करण्यात येणार असल्याचे आणि त्यासाठी टी.पी. स्कीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपअभियंता सी. बी. अहेर यांनी दिली. मात्र, टीपी स्कीम राबविण्याचा सर्व अधिकार हा महापालिकेचा असताना कंपनीमार्फत सदर योजना कशी राबविणार, असा प्रश्न उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी उपस्थित केला. त्यावेळी सीताराम कुंटे यांनीही सदर स्कीम राबविण्याचा अधिकार हा महापालिकेचाच असल्याचे स्पष्ट केले. हनुमानवाडी परिसरातील जागा मोकळी असल्याचे अहेर यांनी सांगितले, परंतु सदर जागेवर स्कीम राबविण्यात मोठी गुंतागुंत असल्याचेही समोर आले. त्यामुळे कुंटे यांनी ग्रीन फिल्डबाबत पुन्हा सखोल चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. गावठाण पुनर्विकासांतर्गत जुन्या नाशिकमध्ये करण्यात येणाऱ्या कामांबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या. जुन्या नाशिकमधील दाट लोकवस्ती आणि तेथील भौगोलिक स्थिती पाहता प्रकल्प अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवरही चर्चा झाली. मनपाच्या कामांची उचलेगिरीक्रिसिलने तयार केलेल्या आराखड्यात महापालिकेतील सत्ताधारी मनसेने कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमांतून राबविण्यात आलेल्या आणि येणाऱ्या काही प्रकल्पांचाही समावेश केल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींनी आश्चर्यभाव दाखवत संताप व्यक्त केला. होळकर पुलाखाली कारंजा, इतिहास संग्रहालय, नेहरू वनोद्यानात वनौषधी उद्यान, उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण, अशोकस्तंभावरील वाहतूक बेटाचे सुशोभिकरण, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क आदि प्रकल्प हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काही प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. काही निविदा प्रक्रियेत आहेत. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे प्रकल्प स्मार्ट सिटी आराखड्यात घुसविण्यात आल्याने आयुक्तांसह अध्यक्ष सीताराम कुंटेही अचंबित झाले. तर महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनीही त्याला आक्षेप घेतला आणि स्मार्ट सिटीतील या उचलेगिरीबद्दल जाब विचारला. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने आराखड्याबाबतही शंकांचे मोहोळ उठले. लोकांसमोर आराखडा मांडा४कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी सदर आराखडा लोकांना सभागृहात निमंत्रित करून त्यांच्यासमोर मांडण्याची सूचना आयुक्त अभिषेक कृष्ण यांना केली. त्यातून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचेही त्यांनी सूचित केले. यावेळी कंपनीचे आर्थिक वर्ष कोणते असेल, अतिरिक्त संचालकांची नियुक्ती, बॅँक खाती, मनुष्यबळ उभारणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कंपनी सेक्रेटरी व लेखापाल यांच्या नियुक्त्या यावरही चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी नियुक्ती, बॅँक खाती उघडणे, अनुषंगिक खर्चासाठी धनादेशांवर स्वाक्षऱ्या आदिंबाबतचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले. शिवाय कंपनीचे एक संकेतस्थळ निर्माण करण्याचाही निर्णय झाला.