शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सर्वाधिक वृक्षसंपदा पंचवटीतच

By admin | Updated: June 19, 2017 19:08 IST

१५२ प्रजाती : ४० फळ, तर नऊ दुर्मिळ वृक्षांच्या जाती

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने शहरात प्रभागनिहाय वृक्षगणनेला सुरुवात करण्यात आलेली असून सहा महिन्यांत जवळपास ११ लाख ८३ हजार वृक्षांची गणना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ व ६ या दोनच प्रभागात आतापर्यंत जवळपास ६ लाख ३२ हजार २०० वृक्षांची गणना झाली आहे. वृक्षगणनेत १५० प्रजाती वृक्षांच्या आढळून आल्या त्यापैकी नऊ जाती दुर्मिळ, तर ४० फळांच्या असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०१६ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षगणनेला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. मनपाच्या ३१ प्रभागांत ही वृक्षगणना तंत्रज्ञान वापरून सुरू करण्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाने सुरू असलेल्या या वृक्षगणनेत झाडांच्या जाती, वय, उंची याची माहिती मिळते. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये आतापर्यंत ३ लाख ७८ हजार २००, तर प्रभाग ६ मध्ये २ लाख ५४ हजार वृक्षांची गणना झाली असून अजूनही वृक्षगणना सुरूच आहे त्यामुळे शहरातील वृक्षगणनेच्या एकूण आकडेवारीनुसार पंचवटी विभागातच सर्वाधिक वृक्षगणना असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुर्मिळ वृक्षांच्या जातीत दांडूस, शेंद्री, वारस, सुरंगी, रुद्राक्ष, राई आवळा, अडुळसा, महारूख या वृक्षांचा समावेश आहे. यापूर्वी २००७ मध्ये सर्व्हे झाला होता, त्यावेळी अंदाजे १५ ते १६ लाख वृक्ष असल्याचा अंदाज होता, मात्र आता तब्बल दहा वर्षांनी वृक्षगणना होत असल्याने हीच संख्या २५ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे मनपाच्या सूत्रांनी बोलून दाखविले. पंचवटी विभागात एकूण सहा प्रभाग असून, आतापर्यंत केवळ दोनच प्रभागांत वृक्षगणना सुरू आहे. अजून चार प्रभाग वृक्षगणनेचे बाकी असून, यात आडगाव, नांदूर, मानूर व मळे परिसरातील वृक्षगणना होणार असल्याने पंचवटीतील वृक्षसंपदेचा आकडा वाढणार आहे.