शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

नाशिक विभागाचा मृत्युदर २ तर जिल्ह्याचा २.११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST

नाशिक : विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ...

नाशिक : विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २,११ टक्के आहे.

विभागात आतापर्यंत १९ हजार ४९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के असल्याचे आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी सांगितले. नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ६५ लाख ४९ हजार ३७५ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ९ लाख ७१ हजार १२५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इन्फो

नाशिकला कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६५ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ९७ हजार ४४९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९२९ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के आहे. आजपर्यंत ८ हजार ६०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

इन्फो

नंदुरबारला सर्वाधिक मृत्युदर

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ४० हजार १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८० टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर विभागात सर्वाधिक म्हणजे २.३६ टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार १९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ हजार २३३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के असून आतापर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

धुळ्यात सर्वात चांगली स्थिती

विभागातील धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९८.४१ टक्के तर जिल्ह्याचा मृत्युदर सर्वात कमी १.४५ टक्के आहे. नगर जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९६.३६ टक्के तर मृत्युदर १.९९ टक्के आहे.