शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
3
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
4
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
5
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
6
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
7
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
8
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
9
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
10
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
11
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
12
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
13
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
14
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
15
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
16
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
17
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मविप्र रुग्णालयात मृत्यूपेक्षा कोरोनामुक्तचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

नाशिकमध्ये कोरोनाकाळात गोरगरीब रुग्णांना आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गेल्यावर्षी मार्च ...

नाशिकमध्ये कोरोनाकाळात गोरगरीब रुग्णांना आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात शासकीय रुग्णालयाच्या सेवा अपुऱ्या पडत असताना या रुग्णालयाचा मोठा आधार मिळाला आहे. या रुग्णालयात आत्तापर्यंत दोन हजार ६५० कोरोनाबाधित दाखल झाले होते. त्यातील ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला म्हणजेच त्याचा मृत्युदर सुमारे १३ टक्के इतका आहे. अर्थात, रुग्णालयात दोन हजार ३०४ रुग्ण बरेदेखील झाले आहेत.

मुळात या रुग्णालयात क्रिटिकल म्हणजेच गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल करण्याची सोय करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी रुग्ण दाखल हाेतात. यात बहुतांशी ग्रामीण भागातील प्राथमिक आराेग्य केंद्रात किंवा अन्य शासकीय रुग्णालयांतून उपचारासाठी पाठवले जातात. त्यानंतरदेखील बहुतांश रुग्णांचा एचआरसीटी स्कोर खूपच अधिक असतो, अशा स्थितीत उपचार केले जातात. याशिवाय रुग्णालयात पाठवले जाणारे कोरोनाबाधित हे अगोदरच व्याधिग्रस्त (कोमार्बिड) असतात. म्हणजेच हृदयराेग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग अधिक गतीने झालेला असतो. त्यामुळेदेखील अशा रुग्णांच्या जीविताला अगोदरच धोका निर्माण झालेला असतो.

या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची काळजी घेतली जातेच, शिवाय कोरोनाकाळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडिसीवरचे पुरेसे इंजेक्शन या सर्वांचीच व्यवस्था केली जाते. कुशल वैद्यकीय वर्गदेखील उपस्थित असतो. त्यामुळे रुग्णालयाकडून जास्तीत जास्त कोरोनाबाधित बरे होणाऱ्यावरच भर दिला जात असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाचे डेथ ऑडिट करून पुढील रुग्णावर आणखी कसे उपचार करून त्याला कोरोनामुक्त करता येईल या दृष्टीने कृती ठरवली जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांंगितले.