शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण

By admin | Updated: November 17, 2014 00:40 IST

मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण

नाशिक : केंद्रात आता परिवर्तन होऊन अच्छे दिन आले आहेत, तर केंद्र सरकारने गोरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करून त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी आणि गोहत्त्येसाठी मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी कायदा बनवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी बोलताना केली.शंकराचार्य संकुलात पुणे येथील गो-विज्ञान संशोधन संस्था आणि नाशिकचे श्री शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित समारंभात राष्ट्रीय पुरस्कार उत्तरांचलातील पंडित गोविंद वल्लभ पंत विद्यापीठातील प्रा. डॉ. रामस्वरूप सिंह चौहान, क्षेत्रीय पुरस्कार मालेगाव येथील अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघाचे अध्यक्ष केसरीमल मेहता यांना प्रदान करण्यात आला, तर स्थानिक गोपालक पुरस्कार जिल्ह्यातील आधारवड येथील काशीनाथ व त्र्यंबक वाघमारे, गोरक्षक पुरस्कार पिंपळगाव येथील संजय सोनवणे आणि सेंद्रिय शेतीबद्दल पुरस्कार खोडीपाडा येथील सम्राट राऊत तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार मोगरे (ता. इगतपुरी) येथील पांडुरंग जाखोरे यांना प्रदान करण्यात आला. हुकूमचंद सावला, रा. स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख भाऊराव पाटील, उद्योजक देवकिसन सारडा आणि बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी हुकूमचंद सावला यांनी सांगितले, गाय ही बिचारी नव्हे तर सामर्थ्यशाली आहे आणि सर्व समस्यांचे निदान आहे. शास्त्र, वेदांमध्ये गायीला अद्भुत जीव म्हटले आहे. गाय हीच माणसाला तारणार असून, सकारात्मक विचार आचरणात आणण्याचे आवाहनही सावला यांनी केले. भाऊराव पाटील यांनी मोरोपंत यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, मोरोपंत हे कल्पक व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम लोकसंग्राहक होते. गायीमधील विज्ञान त्यांनी लोकांना समजून सांगितले. गायीच्या आधारावरच हिंदुत्वाचे रक्षण व जागरण होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त केशरीमल मेहता यांनी पंचगव्यात औषधी गुणधर्म असल्याचे सांगत बलसाडजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जात असल्याचे सांगितले, तर प्रा. रामस्वरूप सिंह चौहान यांनी सांगितले, पिकांवर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहेत. गोमूत्राने रोगप्रतिकार शक्ती वाढते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. देशी गायींवर संशोधनासाठी स्वतंत्र संस्थेची गरज असल्याचेही चौहान यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय पांडुरंग भरीत, रघुवीर पाटसकर, मिलिंद देवल, रमेश कर्पे व राजेंद्र्र लुंकड यांनी करून दिला. सूत्रसंचालन बापू कुलकर्णी यांनी केले. व्यासपीठावर दादरा नगर हवेली मुक्तिसंग्राम समितीचे सचिव वसंतराव प्रसादे व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)