शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी सरींचा वर्षाव; नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा ...

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.दक्षिण पूर्व-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवामानात मोठा बदल नाशिककरांना अनुभवायला येत अहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दृश्यमानतादेखील कमी झाली होती. मध्यम सरींचा रिमझिम वर्षाव, दाटलेले धुके आणि सुटलेला थंड वारा असे काहीसे वातावरण अनुभवायला आले. यामुळे रविवारची सुटी असूनही शहरामधील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली नाही. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

---इन्फो---

बागायतदारांवर अस्मानी संकट

या वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. कांदा, द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष बागायतदारांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य औषध फवारणी तसेच बागांमध्ये शेकोट्या पेटवून याेग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे. या विचित्र वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. द्राक्षबागांची मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेताना बागायतदार दिसून येत आहेत.

---इन्फो---

बाष्प अन‌् आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ

शहरात हवामान बदलामुळे वातावरणात बाष्प व आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळी हवेत ९२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता मोजली गेली. तसेच संध्याकाळीसुध्दा आर्द्रतेचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले. यामुळे नाशिककरांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. वातावरण थंड झाल्यामुळे गोदाघाटावर तसेच शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नाशिककरांनी थंडीचा बचाव करण्यासाठी रविवारी दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करण्यावर भर दिला.

--इन्फो--

उत्तरेचे थंड वारे राेखले गेले

उत्तरेकडून निर्माण होणारे थंड वारे ढगाळ हवामानामुळे राेखले जात आहेत. यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे; मात्र वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. शहराचा किमान तापमानाचा पारा अचानकपणे वाढल्याने थंडीची तीव्रता घटलेली आहे. ढगाळ हवामान आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे पडणाऱ्या हलक्या सरींंमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे, असे हवामान केंद्राचे प्रमुख सुनील काळभोर यांनी सांगितले.

-इन्फो--

...म्हणून थंडी लांबणीवर

अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे थंडीचे दिवस लांबणीवर गेले आहेत. थंडी लांबण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. २०१२ ते २०१८ पर्यंत ५ ते ७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची शहरात नोंद झाली होती; मात्र, पर्यावरणीय असमतोल, निसर्गचक्रातील बदल, चक्रीवादळे, वाऱ्यांच्या बदलणाऱ्या दिशा यामुळे वातावरणात कमालीचा बदल होत आहे. यामुळे यंदा पुन्हा कडाक्याच्या थंडीचा कालावधी लांबणीवर पडला आहे.

--कोट---

द्राक्षबागांवर संकटच आहे. वातावरणामुळे सकाळी औषध फवारणी करण्यावर भर देत आहोत. रिमझिम पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे. झाडांची कार्य करण्याची क्षमता थांबली. फ्लॉवरिंगचा टप्पा संकटात आहे. द्राक्षबागांवर कॅल्शियम फवारणी तसेच भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून औषध फवारणीवर भर देत आहोत.

-सचिन काकड, द्राक्ष बागायतदार