शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

साकोऱ्यातील मोरखडी बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

* पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ७ हजार पक्षी आणि १० शेळ्या गतप्राण, सन २०११ नंतर दुसरा महापूर * रस्ता खचल्याने ...

* पोल्ट्रीत पाणी घुसल्याने ७ हजार पक्षी आणि १० शेळ्या गतप्राण, सन २०११ नंतर दुसरा महापूर

* रस्ता खचल्याने १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटला, रात्रीपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प, लाखोंचे नुकसान

साकोरा : नांदगाव तालुक्यात दोन दिवसांपासून संततधारेमुळे नदी-नाले एक झाले. नांदगाव-साकोरा रस्त्यावर असलेल्या मोरखडी बंधाऱ्यात पाणी ओहरफ्लो झाल्याने, तसेच अवघ्या चार महिन्यांपूर्वी सा.बां. विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बंधारा फुटल्याने हजारो एकर उभ्या पिकांच्या शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या पोल्ट्रीत पाणी शिरल्याने पक्षी, तसेच शेळ्यांचा जीव गेला आहे, तसेच या पाण्यामुळे रस्ता खचल्याने या भागातील एकूण १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटल्याने रात्रीपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

साकोरा-नांदगाव रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ठेकेदारी पद्धतीत रस्ता रुंदीकरणाचे काम झाले. मात्र, आज बंधारा फुटला. त्याच जागेवर संबंधित ठेकेदाराने आणि पाटबंधारे विभागाने यांच्या सुविचाराने मोठी मोरी टाकून भर टाकली असती तर आज बंधारा फुटला नसता असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. या कामात रस्ता कामासाठी सरळ जेसीबीने बंधाराच कोरल्याने खालचा भाग पोकळ झाला, भराव खचल्याने चक्क रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचला आणि काल रात्री अचानक बंधारा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने सां.बा. खाते ठेकेदार आणि पाटबंधारे विभाग यांच्यावर कारवाई करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--------------------------

सहा घरे पूर्ण पाण्याखाली

सदर बंधारा फुटल्याने या रस्त्यालगतच्या सुरसे कुटुंबातील सहा घरे पूर्ण पाण्यात सापडले असून, कांद्याचे चाळीचे, पोल्ट्रीचे, पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच मधुकर पवार यांच्या शेळींच्या सपरात पाणी शिरल्याने दहा शेळ्या मरण पावल्या. कांद्याच्या चाळीत पाणी घुसले असून, परिसरातील शिवाजी बोरसे, देवचंद बोरसे, शिवा बोरसे, संजय वाघ, सर्जेराव छत्रे अशा अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शाकंभरी नदी तीरावरील संजय बोरसे यांच्या पोल्ट्रीत अचानक पाणी शिरल्याने तत्पर पाच हजार पक्षी वाचविण्यात बोरसे यांना यश आले; परंतु सात हजार पक्षी संपूर्ण पाण्यात बुडाल्याने मृत झाल्याने बोरसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

-------------------------------

पाणीच पाणी चोहीकडे

सन १९७२ या दुष्काळी काळात सदर जागेवर अगदी दगड-मातीत सुरू करण्यात आलेले मोरखडी बंधाऱ्याचे काम १९७४ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. मात्र, १९७८ ला या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले होते. या बंधाऱ्याच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती सुजलाम होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सदर बंधारा संबंधित विभागाने फोडला असा आरोप अनेक शेतकरी करू लागले आहेत. बुधवारी रात्री अचानक फुटलेल्या बंधाऱ्यामुळे नांदगाव रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता गायब झाला असून, या भागातील १५ गावांचा नांदगावशी संपर्क तुटला असून, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरित रस्त्याचे काम करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे. (०८ साकोरा,१,२)