शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

अटल भूजल योजनेतून सिन्नरच्या ८० गावांना अधिकचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

सिन्नर : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा बसत असल्याने सिन्नर तालुकावासीयांना पाण्याचे महत्त्व सर्वाधिक माहिती आहे. सिन्नर तालुक्याला अधिकचे पाणी मिळावे, ...

सिन्नर : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा बसत असल्याने सिन्नर तालुकावासीयांना पाण्याचे महत्त्व सर्वाधिक माहिती आहे. सिन्नर तालुक्याला अधिकचे पाणी मिळावे, यासाठी नदीजोड प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. अटल भूजल योजनेतूनही तालुक्यातील ८७ गावांना आता अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. अटल भूजल योजना तालुक्यासाठी वरदान ठरणारी असून लोकसहभागातून योजनेचा सूक्ष्म आराखडा तयार करणे गरजेचे आहे. योजना यशस्वी करण्यासाठी योजनेत समावेश असलेल्या ८७ गावांमधील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून एकत्रित काम करावे, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

दीड वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने अटल भूजल योजना अस्तित्वात आणली. सतत पाणीटंचाई असलेल्या गावांमधील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती गोळा करून पाण्याची तूट भरून काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबरोबरच टंचाईग्रस्त गावशिवारातील भूजल पातळी कशी वाढेल याविषयीची विशेष उपाययोजना अटल भूजल योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सिन्नर आणि देवळा या तालुक्यांची निवड करण्यात आली असून सिन्नर तालुक्यातील ८७ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.

अटल भूजल योजना यशस्वी करण्यासाठी बुधवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना गोडसे यांनी आवाहन केले. व्यासपीठावर प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, योगेश पाच्शापुरकर, विलास सानप, प्रवीण बधान आदी अधिकाऱ्यांसह संजय सानप, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पिराजी पवार आदी मान्यवर तसेच ८७ गावांचे सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योजेनेचे महत्त्व आणि योजनेची सविस्तर माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी अटन भूजल योजेनेचे सादरीकरण करण्यात आले.

---------------------------------

भौगोलिक परिस्थितीवर आधारित आराखडा

अटल भूजल योजना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रथम गावाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित आराखडा तयार करावा, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करावा, गावशिवारात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या जलसंधारणाच्या कामाची दुरुस्ती, अस्तित्वात असलेल्या साठवण प्रकल्पांमधील गाळाचा उपसा काढावा, कार्यक्षम पाणी वापर पद्धतीचे महत्त्व अंगीकरण करावे, माती-दगड आण सिमेंटचे नाले बांधावेत. शेतशिवारातील विहिरींचे पुनर्भरण करावे, मातीचा प्रकार आणि जमिनीची धारण क्षमता तपासावी, २० ते ३० वर्षांपासूनच्या प्रर्जन्यमानाचा आढावा घ्यावा, पाणी आणि पिकांची संरचना करावी, या ठळक मुद्द्यांविषयीचे अभ्यासपूर्ण सादरीकरण यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले.

-----------------

सिन्नर येथे अटल भूजल योजनेविषयी आयोजित बैठकीत बोलतांना खासदार हेमंत गोडसे. व्यासपीठावर प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नीलेश केदार आदी. (१४ सिन्नर २)

140721\14nsk_17_14072021_13.jpg

१४ सिन्नर २