शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

शहरात ग्रामीणपेक्षा दुपटीहून अधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत ...

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून ४७ बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९१७ वर पोहोचली आहे. शहरात ग्रामीणच्या तुलनेत दुपटीहून अधिक बळी गेले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आठवडाभरापासून ५००च्या आसपास रहात असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने ४०हून अधिक राहत असल्याने बळींच्या प्रमाणात घट कशी आणावी, हीच चिंता आरोग्य विभागाला सतावते आहे. शनिवारीदेखील पुन्हा एकदा नाशिक ग्रामीणपेक्षा नाशिक महानगरातील बळींची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. ग्रामीणला १५, तर शहरात ३१ आणि मालेगाव मनपा एक याप्रमाणे ४७ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने बळींच्या प्रमाणात नियंत्रण आणण्यावरच आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नाशिक शहरात दिवसभरात नवीन १८२, ग्रामीणला २९५ मालेगाव मनपात ११, तर जिल्हाबाह्य ७, असे बाधितांचे प्रमाण राहिले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांचे प्रमाणदेखील १,२३८ वर आले असून, त्यात ग्रामीणचे ६३३, नाशिक शहराचे २९६, तर मालेगाव मनपाचे ३०९ इतके आहे. दरम्यान, एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ६,७४८ वर पोहोचली असून, त्यात नाशिक ग्रामीणचे ३४९१, नाशिक मनपाचे ३,०४२, तर मालेगाव मनपाचे १९५ आणि जिल्हाबाह्य २० रुग्णांचा त्यात समावेश आहे.

कोरोनामुक्त प्रमाण ९७ टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण बरोबर ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपात ९७.७१, ग्रामीण ९५.९८ , मालेगाव मनपा ९५.८६, तर जिल्हाबाह्य ९७.७३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तचे प्रमाण गतवर्षीदेखील ९८ टक्क्यांवर गेले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट आल्याने अद्यापही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.