शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शहरात ग्रामीणपेक्षा दुपटीहून अधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत ...

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून ४७ बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९१७ वर पोहोचली आहे. शहरात ग्रामीणच्या तुलनेत दुपटीहून अधिक बळी गेले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आठवडाभरापासून ५००च्या आसपास रहात असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने ४०हून अधिक राहत असल्याने बळींच्या प्रमाणात घट कशी आणावी, हीच चिंता आरोग्य विभागाला सतावते आहे. शनिवारीदेखील पुन्हा एकदा नाशिक ग्रामीणपेक्षा नाशिक महानगरातील बळींची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. ग्रामीणला १५, तर शहरात ३१ आणि मालेगाव मनपा एक याप्रमाणे ४७ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने बळींच्या प्रमाणात नियंत्रण आणण्यावरच आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नाशिक शहरात दिवसभरात नवीन १८२, ग्रामीणला २९५ मालेगाव मनपात ११, तर जिल्हाबाह्य ७, असे बाधितांचे प्रमाण राहिले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांचे प्रमाणदेखील १,२३८ वर आले असून, त्यात ग्रामीणचे ६३३, नाशिक शहराचे २९६, तर मालेगाव मनपाचे ३०९ इतके आहे. दरम्यान, एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ६,७४८ वर पोहोचली असून, त्यात नाशिक ग्रामीणचे ३४९१, नाशिक मनपाचे ३,०४२, तर मालेगाव मनपाचे १९५ आणि जिल्हाबाह्य २० रुग्णांचा त्यात समावेश आहे.

कोरोनामुक्त प्रमाण ९७ टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण बरोबर ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपात ९७.७१, ग्रामीण ९५.९८ , मालेगाव मनपा ९५.८६, तर जिल्हाबाह्य ९७.७३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तचे प्रमाण गतवर्षीदेखील ९८ टक्क्यांवर गेले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट आल्याने अद्यापही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.