शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

वसुलीपेक्षा थकबाकी अधिक

By admin | Updated: May 8, 2017 01:35 IST

जिल्हा बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले असून, त्यापोटी अवघे १५७ कोटींचे कर्ज वसूल झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले असून, त्यापोटी अवघे १५७ कोटींचे (५.६० टक्के) कर्ज वसूल झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी त्यांनी भरलेली पीककर्जाची रक्कम त्यांना परत केली जाईल. मात्र तूर्तास पीककर्जाची थकबाकी भरून बॅँकेची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन बॅँकेने केले आहे. दरम्यान, जिल्हा बॅँकेत शिक्षकांच्या वेतनापोटी जिल्हा परिषदेकडून वर्ग झालेली ८५ कोटी ३५ लाखांची रक्कम स्टेट बॅँक आॅफ इंडियामध्ये चालू खात्यात जमा केली आहे. त्यातील ४३ कोटी जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये टी.टी.द्वारे वर्ग केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन मिळत नसल्याचा दावा नरेंद्र दराडे यांनी केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माणिकराव कोकाटे, परवेज कोकणी, गणपतराव पाटील, धनंजय पवार आदि उपस्थित होते. त्यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अडचणींबाबत माहिती दिली. १९९२ सालापासून शिक्षकांच्या वेतनापोटींचा सेवा कर जिल्हा बॅँक घेत नसल्याने सुमारे १८ ते २० कोटींचे या पोटी येणे सरकारकडे आहे. मात्र शिक्षकांनी वेतन मिळत नसल्याचे कारण देत जिल्हा बॅँकेसमोर वारंवार निदर्शने आणि ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हा बॅँकेची बदनामी झाल्याने यापुढे शिक्षकांकडून त्यांच्या वेतनापोटींचा सेवाकर आकारण्याचा निर्णय जिल्हा बॅँकेने घेतल्याचा दावा संचालक माणिकराव कोकाटे यांनी केला. शिक्षकांच्या वेतनाची रक्कम यापूर्वीच स्टेट बॅँक आॅफ इंडियात जमा केलेली असल्याने आणि स्टेट बॅँकेकडे चलन तुटवडा असल्याने रोख पैसे मिळत नसल्याचे संचालक शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. बॅँकेच्या आजमितीस ३१२१ कोटींच्या ठेवी असून, ९४५ कोटींची गुंतवणूक बॅँकेने नाबार्डच्या निर्देशानुसार केलेली आहे. ३४१ कोटींच्या नोटा न स्वीकारल्याने आणि शिखरबॅँकेकडून वेळेवर कर्जाची रक्कम उपलब्ध होत नसल्यानेच बॅँकेची आर्थिक कोंडी झाल्याचा दावा संचालक परवेज कोकणी यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी केल्यानेच राज्यातील शेतकरी त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीककर्जाची परतफेड करीत नसल्याने सुमारे दोन हजारांहून अधिक कोटींचे पीककर्ज थकल्याचा दावा संचालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)