शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सीबीएसई दहावीतील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणे जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात सीबीएसई मंडळाने परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, आता पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका व गुणवत्ता क्रमवारीचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असून राज्य व केंद्र सरकारने अकरावी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर एकसूत्रता असलेले धोरण निश्चित करण्याची पेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

मुले - ८१५

मुली - ७५५

सीबीएसई शाळा - १८

---

पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता

सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कौशल्याधारित विषयांचे गुण ग्राह्य धरून बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, अशी तरतूद केली आहे. कोणताही विद्यार्थी नापास होणार नसेल तर कोरोना संकटात परीक्षा घेवून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

- प्रशांत जाधव, पालक.

--

कोणत्याही परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सीबीएसीई दहावीच्या परीक्षा घेणे धोक्याचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, पुढील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता आहे.

- गौरी सिन्हा, पालक.

--

सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे, परंतु, आता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयातून राष्ट्रीयस्तरावर एकच घोरण निश्चित करणे आ‌वश्यक झाले आहे. -अंजली परदेशी, पालक