शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीतील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणे जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात सीबीएसई मंडळाने परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, आता पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका व गुणवत्ता क्रमवारीचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असून राज्य व केंद्र सरकारने अकरावी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर एकसूत्रता असलेले धोरण निश्चित करण्याची पेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

मुले - ८१५

मुली - ७५५

सीबीएसई शाळा - १८

---

पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता

सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कौशल्याधारित विषयांचे गुण ग्राह्य धरून बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, अशी तरतूद केली आहे. कोणताही विद्यार्थी नापास होणार नसेल तर कोरोना संकटात परीक्षा घेवून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

- प्रशांत जाधव, पालक.

--

कोणत्याही परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सीबीएसीई दहावीच्या परीक्षा घेणे धोक्याचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, पुढील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता आहे.

- गौरी सिन्हा, पालक.

--

सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे, परंतु, आता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयातून राष्ट्रीयस्तरावर एकच घोरण निश्चित करणे आ‌वश्यक झाले आहे. -अंजली परदेशी, पालक