शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

सीबीएसई दहावीतील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणे जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात सीबीएसई मंडळाने परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, आता पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका व गुणवत्ता क्रमवारीचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असून राज्य व केंद्र सरकारने अकरावी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर एकसूत्रता असलेले धोरण निश्चित करण्याची पेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

मुले - ८१५

मुली - ७५५

सीबीएसई शाळा - १८

---

पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता

सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कौशल्याधारित विषयांचे गुण ग्राह्य धरून बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, अशी तरतूद केली आहे. कोणताही विद्यार्थी नापास होणार नसेल तर कोरोना संकटात परीक्षा घेवून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

- प्रशांत जाधव, पालक.

--

कोणत्याही परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सीबीएसीई दहावीच्या परीक्षा घेणे धोक्याचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, पुढील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता आहे.

- गौरी सिन्हा, पालक.

--

सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे, परंतु, आता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयातून राष्ट्रीयस्तरावर एकच घोरण निश्चित करणे आ‌वश्यक झाले आहे. -अंजली परदेशी, पालक