शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सीबीएसई दहावीतील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणे जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात सीबीएसई मंडळाने परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, आता पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका व गुणवत्ता क्रमवारीचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असून राज्य व केंद्र सरकारने अकरावी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर एकसूत्रता असलेले धोरण निश्चित करण्याची पेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

मुले - ८१५

मुली - ७५५

सीबीएसई शाळा - १८

---

पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता

सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कौशल्याधारित विषयांचे गुण ग्राह्य धरून बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, अशी तरतूद केली आहे. कोणताही विद्यार्थी नापास होणार नसेल तर कोरोना संकटात परीक्षा घेवून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

- प्रशांत जाधव, पालक.

--

कोणत्याही परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सीबीएसीई दहावीच्या परीक्षा घेणे धोक्याचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, पुढील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता आहे.

- गौरी सिन्हा, पालक.

--

सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे, परंतु, आता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयातून राष्ट्रीयस्तरावर एकच घोरण निश्चित करणे आ‌वश्यक झाले आहे. -अंजली परदेशी, पालक