शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

कोरोनामुळे मृत्यूच्या तुलनेत मधुमेह, उच्चदाबाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय ...

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याबरोबरच त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. आरोग्य खात्याने केलेल्या मृत्यूच्या लक्षणांच्या निरीक्षणात वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के इतके उच्चांकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणत: चाळिशीनंतर प्रत्येक नागरिकाला कुठल्या ना कुठल्या शारीरिक व्याधी भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. अशा आजाराने त्रस्त रुग्ण अगोदरच आपली शारीरिक क्षमता गमावून बसलेला असल्याने त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास ते गंभीर मानले जात आहे. नाशिक जिल्ह्यात १ एप्रिल रोजी २४०७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. हेच प्रमाण संपूर्ण महिन्यात म्हणजेच ३० एप्रिल रोजी ३४९७ पर्यंत पोहोचले. याचाच अर्थ १०९० रुग्ण एका महिन्यात दगावले आहेत. आजवरच्या एकूण दगावलेल्या रुग्णांपैकी ११२७ रुग्ण हे कोमार्बिड म्हणजेच कोरोनाबरोबरच अतिगंभीर आजारांनी त्रस्त होते. त्याचे प्रमाण एक तृतीयांश इतके असल्याने ते रोखण्यासाठी आरोग्य खात्याने घरोघरी जाऊन अशा रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून, अशा रुग्णांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.

----------

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू- १०९०

२०७ इतर आजारांमुळे मृत्यू

८८३ कोरोनामुळे मृत्यू

--------------

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी वेळच्या वेळी स्वत:च्या आरोग्याची तपासणी नियमित करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर औषधोपचारात हलगर्जीपणा करू नये, तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात न येता, स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. कोरोना काळात अतिगंभीर रुग्णांनी वेळोवेळी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणेही क्रमप्राप्त आहे.