शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कोरोनामुळे मृत्यूच्या तुलनेत मधुमेह, उच्चदाबाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय ...

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याबरोबरच त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. आरोग्य खात्याने केलेल्या मृत्यूच्या लक्षणांच्या निरीक्षणात वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के इतके उच्चांकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणत: चाळिशीनंतर प्रत्येक नागरिकाला कुठल्या ना कुठल्या शारीरिक व्याधी भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. अशा आजाराने त्रस्त रुग्ण अगोदरच आपली शारीरिक क्षमता गमावून बसलेला असल्याने त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास ते गंभीर मानले जात आहे. नाशिक जिल्ह्यात १ एप्रिल रोजी २४०७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. हेच प्रमाण संपूर्ण महिन्यात म्हणजेच ३० एप्रिल रोजी ३४९७ पर्यंत पोहोचले. याचाच अर्थ १०९० रुग्ण एका महिन्यात दगावले आहेत. आजवरच्या एकूण दगावलेल्या रुग्णांपैकी ११२७ रुग्ण हे कोमार्बिड म्हणजेच कोरोनाबरोबरच अतिगंभीर आजारांनी त्रस्त होते. त्याचे प्रमाण एक तृतीयांश इतके असल्याने ते रोखण्यासाठी आरोग्य खात्याने घरोघरी जाऊन अशा रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून, अशा रुग्णांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.

----------

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू- १०९०

२०७ इतर आजारांमुळे मृत्यू

८८३ कोरोनामुळे मृत्यू

--------------

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी वेळच्या वेळी स्वत:च्या आरोग्याची तपासणी नियमित करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर औषधोपचारात हलगर्जीपणा करू नये, तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात न येता, स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. कोरोना काळात अतिगंभीर रुग्णांनी वेळोवेळी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणेही क्रमप्राप्त आहे.