शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भविष्यात नाशिकमध्ये अजून धरणे उभारावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, ...

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, अशी जाणीव के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी करून दिली.

वसंत व्याख्यानमालेत ‘नाशिकचे पाणी’ या विषयावर ते बोलत होते. स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. कुटे यांनी चोविसावे पुष्प गुंफले. यादरम्यान त्यांनी ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत होणाऱ्या नाशिकच्या पाण्याच्या प्रवासातील स्थित्यंतरे प्रकर्षाने मांडली. देशात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३५४ धरणे महाराष्ट्रात असूनही सिंचन क्षमता फक्त सोळा टक्के आहे. ही लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. केवळ धरणे बांधून चालणार नाही, तर सिंचन क्षमता वाढेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. राज्यात शहरीकरणाचा वेग असलेले नाशिक हे पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. शहरीकरण होते तेव्हा जलस्रोत कमी होतात. १८८१ साली नाशिकमध्ये ९५ हजार लोकसंख्या असताना २१४ विहिरी, ३७ तलाव, १३२ जलस्रोत होते. विशेष म्हणजे नाशिकची जीवनदायिनी म्हणून नंदिनी नदी म्हणजेच आजच्या नासरडी नदीला स्थान होते. गोदावरी नदी फक्त कर्मकांड करण्यापुरती होती. आज त्याच नंदिनी नदीचा नाला बनल्याची खंत डॉ. सुनील कुटे यांनी व्यक्त केली.

आजमितीला नाशिक शहराची लोकसंख्या २० लाख असून, पावसाचे प्रमाण ७० मिलिमीटर आहे. स्मार्टसिटी उदयास येत असताना पाण्याचे व्यवस्थापन स्मार्ट झाले पाहिजे. जगातील पहिले मातीचे धरण गंगापूर असून, या धरणामुळे नाशिकचा विकास वेगाने झाला. पिण्याचे पाणी, याबरोबरच औद्योगिक वसाहती, शेतीलाही धरणातून पाणीपुरवठा होतो. गौतमी, गोदावरी आणि काश्यपी धरणावर नाशिकची तहान भागविली जात आहे. थेट पाइपलाइन योजनेतून पुरवठा होताना पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसत आहे. चाळीस हजार नळांद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो; पण अर्धेअधिक नळ विनातोटीचे असल्याने पाणी वाया जाते. प्रति माणशी पाणी देताना मानके पाळली जात नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातून ३५ टक्के अतिरिक्त पाणी दिले जाते, याकडे डॉ. कुटे यांनी लक्ष वेधले.

भविष्यकाळात २५ लाख लोकसंख्या गृहित धरून पाण्याचे नियोजन व्हायला हवे. कमी पाऊस, पाणीचोरी यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन होण्याची गरज आहे. गोदावरीचे आरोग्य बिकट असून, वाळू चोरीमुळे नदीची घुसमट होत आहे. सांडपाणी सर्रास नदीत सोडल्याने प्रदूषण ही समस्या भेडसावतेय. जलशुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेत जलशास्त्र विभागाची निर्मिती व्हावी, असे डॉ. कुटे यांनी सूचित केले. जिल्ह्यातील ज्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी अडवून धरणे उभारण्यात यावीत, अशी पुस्तीही डॉ. कुटे यांनी जोडली. माजी महापौर शांतारामबापू वावरे यांनी दूरदृष्टी ठेवून पाण्याचे नियोजन केल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळाल्याचे डॉ. कुटे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.