शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात नाशिकमध्ये अजून धरणे उभारावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, ...

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, अशी जाणीव के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी करून दिली.

वसंत व्याख्यानमालेत ‘नाशिकचे पाणी’ या विषयावर ते बोलत होते. स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. कुटे यांनी चोविसावे पुष्प गुंफले. यादरम्यान त्यांनी ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत होणाऱ्या नाशिकच्या पाण्याच्या प्रवासातील स्थित्यंतरे प्रकर्षाने मांडली. देशात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३५४ धरणे महाराष्ट्रात असूनही सिंचन क्षमता फक्त सोळा टक्के आहे. ही लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. केवळ धरणे बांधून चालणार नाही, तर सिंचन क्षमता वाढेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. राज्यात शहरीकरणाचा वेग असलेले नाशिक हे पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. शहरीकरण होते तेव्हा जलस्रोत कमी होतात. १८८१ साली नाशिकमध्ये ९५ हजार लोकसंख्या असताना २१४ विहिरी, ३७ तलाव, १३२ जलस्रोत होते. विशेष म्हणजे नाशिकची जीवनदायिनी म्हणून नंदिनी नदी म्हणजेच आजच्या नासरडी नदीला स्थान होते. गोदावरी नदी फक्त कर्मकांड करण्यापुरती होती. आज त्याच नंदिनी नदीचा नाला बनल्याची खंत डॉ. सुनील कुटे यांनी व्यक्त केली.

आजमितीला नाशिक शहराची लोकसंख्या २० लाख असून, पावसाचे प्रमाण ७० मिलिमीटर आहे. स्मार्टसिटी उदयास येत असताना पाण्याचे व्यवस्थापन स्मार्ट झाले पाहिजे. जगातील पहिले मातीचे धरण गंगापूर असून, या धरणामुळे नाशिकचा विकास वेगाने झाला. पिण्याचे पाणी, याबरोबरच औद्योगिक वसाहती, शेतीलाही धरणातून पाणीपुरवठा होतो. गौतमी, गोदावरी आणि काश्यपी धरणावर नाशिकची तहान भागविली जात आहे. थेट पाइपलाइन योजनेतून पुरवठा होताना पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसत आहे. चाळीस हजार नळांद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो; पण अर्धेअधिक नळ विनातोटीचे असल्याने पाणी वाया जाते. प्रति माणशी पाणी देताना मानके पाळली जात नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातून ३५ टक्के अतिरिक्त पाणी दिले जाते, याकडे डॉ. कुटे यांनी लक्ष वेधले.

भविष्यकाळात २५ लाख लोकसंख्या गृहित धरून पाण्याचे नियोजन व्हायला हवे. कमी पाऊस, पाणीचोरी यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन होण्याची गरज आहे. गोदावरीचे आरोग्य बिकट असून, वाळू चोरीमुळे नदीची घुसमट होत आहे. सांडपाणी सर्रास नदीत सोडल्याने प्रदूषण ही समस्या भेडसावतेय. जलशुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेत जलशास्त्र विभागाची निर्मिती व्हावी, असे डॉ. कुटे यांनी सूचित केले. जिल्ह्यातील ज्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी अडवून धरणे उभारण्यात यावीत, अशी पुस्तीही डॉ. कुटे यांनी जोडली. माजी महापौर शांतारामबापू वावरे यांनी दूरदृष्टी ठेवून पाण्याचे नियोजन केल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळाल्याचे डॉ. कुटे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.