शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भविष्यात नाशिकमध्ये अजून धरणे उभारावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, ...

नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, अशी जाणीव के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी करून दिली.

वसंत व्याख्यानमालेत ‘नाशिकचे पाणी’ या विषयावर ते बोलत होते. स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. कुटे यांनी चोविसावे पुष्प गुंफले. यादरम्यान त्यांनी ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत होणाऱ्या नाशिकच्या पाण्याच्या प्रवासातील स्थित्यंतरे प्रकर्षाने मांडली. देशात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३५४ धरणे महाराष्ट्रात असूनही सिंचन क्षमता फक्त सोळा टक्के आहे. ही लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. केवळ धरणे बांधून चालणार नाही, तर सिंचन क्षमता वाढेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. राज्यात शहरीकरणाचा वेग असलेले नाशिक हे पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. शहरीकरण होते तेव्हा जलस्रोत कमी होतात. १८८१ साली नाशिकमध्ये ९५ हजार लोकसंख्या असताना २१४ विहिरी, ३७ तलाव, १३२ जलस्रोत होते. विशेष म्हणजे नाशिकची जीवनदायिनी म्हणून नंदिनी नदी म्हणजेच आजच्या नासरडी नदीला स्थान होते. गोदावरी नदी फक्त कर्मकांड करण्यापुरती होती. आज त्याच नंदिनी नदीचा नाला बनल्याची खंत डॉ. सुनील कुटे यांनी व्यक्त केली.

आजमितीला नाशिक शहराची लोकसंख्या २० लाख असून, पावसाचे प्रमाण ७० मिलिमीटर आहे. स्मार्टसिटी उदयास येत असताना पाण्याचे व्यवस्थापन स्मार्ट झाले पाहिजे. जगातील पहिले मातीचे धरण गंगापूर असून, या धरणामुळे नाशिकचा विकास वेगाने झाला. पिण्याचे पाणी, याबरोबरच औद्योगिक वसाहती, शेतीलाही धरणातून पाणीपुरवठा होतो. गौतमी, गोदावरी आणि काश्यपी धरणावर नाशिकची तहान भागविली जात आहे. थेट पाइपलाइन योजनेतून पुरवठा होताना पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसत आहे. चाळीस हजार नळांद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो; पण अर्धेअधिक नळ विनातोटीचे असल्याने पाणी वाया जाते. प्रति माणशी पाणी देताना मानके पाळली जात नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातून ३५ टक्के अतिरिक्त पाणी दिले जाते, याकडे डॉ. कुटे यांनी लक्ष वेधले.

भविष्यकाळात २५ लाख लोकसंख्या गृहित धरून पाण्याचे नियोजन व्हायला हवे. कमी पाऊस, पाणीचोरी यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन होण्याची गरज आहे. गोदावरीचे आरोग्य बिकट असून, वाळू चोरीमुळे नदीची घुसमट होत आहे. सांडपाणी सर्रास नदीत सोडल्याने प्रदूषण ही समस्या भेडसावतेय. जलशुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेत जलशास्त्र विभागाची निर्मिती व्हावी, असे डॉ. कुटे यांनी सूचित केले. जिल्ह्यातील ज्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी अडवून धरणे उभारण्यात यावीत, अशी पुस्तीही डॉ. कुटे यांनी जोडली. माजी महापौर शांतारामबापू वावरे यांनी दूरदृष्टी ठेवून पाण्याचे नियोजन केल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळाल्याचे डॉ. कुटे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.