शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नाशकात अकरावीच्या २५ टक्यांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:07 IST

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

ठळक मुद्देअकरावीच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता अनेकांची आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेशाला पसंती

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.नाशिक महानगर पालिका क्षेत्रात अकरावीच्या २३  हजार ८६० जागा असून आत्तापर्यंत २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी बहूतांश विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालच निवडल्याने अन्य जागा रिक्त राहिल्या आहेत. शहरातील सुमारे २३हजार ८६० जागांपैकी केवळ  साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली असली तरी यातील २ ते अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांधील सुमारे ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक शहरात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार तीन नियमित फेºया राबविण्यात आल्यानंतर चौथ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पसंती दिल्याने या फेरीनंतरही शहरात अकरावीच्या ८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटआॅफ सर्वाधिक ८४ टक्के लागला. याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कटआॅफ ९०.२० टक्के लागला.  पहिल्या तीन फेºयांच्या तुलनेत इतर महाविद्यालयांचे कटआॅफ खाली आले आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी प्रथम तीन फेºयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विशेष फेरीत अन्य महाविद्यालयांचे पर्याय निवडल्याचे दिसून येत असून या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य दिले असणार नामांकित महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना अजूनही संधी उपलब्ध होणार आहे.