शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

मनपाच्या मासिक सभेत खडाजंगी

By admin | Updated: August 21, 2016 01:16 IST

मालेगाव : शिवसेनेचा सभात्याग; नगरसेवकांकडून गदारोळ

आझादनगर : मालेगाव महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत काकूबाईचा बाग येथील प्राथमिक शाळेतील १० खोल्या काकाणी शाळेस देणे व हद्दवाढीतील ग्रामपंचायतीतील उर्वरित ४८ कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर महापौर व सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. संबंधित संस्थेस ‘जातीवादी’ संस्था असा आरोप केल्याने सेना नगरसेवकांनी आक्षेप घेत सभात्याग केला. यावेळी सदस्यांनी गदारोळ करीत महापौर व प्रशासनास धारेवर धरले.सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मो. इब्राहीम होते, तर प्रभारी आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नगरसचिव राजेश धसे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभच गदारोळाने झाला. प्रथम हा इतिवृत्त कायम करणे होता; परंतु यावरच आक्षेप घेत सदस्यांनी त्यास तहकूब करण्यास भाग पाडले. दुसरा विषय महापौरांच्या शिफारसीनुसार संगमेश्वर स. नं. १३ मधील काकूबाईचा बाग येथील मनपाच्या प्राथमिक शाळेच्या दहा वर्गखोल्या मालेगाव एज्युकेशन सोसायटीस भाडेतत्त्वावर देण्याचा विषय होता. शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सोनवणे यांनी माहिती देतानाच आपल्या अहवालात आक्षेप घेतल्याचे सांगितले. याचदरम्यान याच भागाचे नगरसेवक जावीद शेख यांनी या विषयास जोरदार विरोध दर्शविला. शेख म्हणाले की, किल्ला ही पुरातत्व विभागाची मालकीची मालमत्ता आहे. तेथे कुणीही केव्हाही येऊ शकते; परंतु या संस्थाचालकांकरवी काहीवेळा मुलांना येथे येण्यास मज्जाव केला जातो. जाणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात येते. येथील इमारतीस परवानगी नाही. अनेक अवैध बांधकाम केलेल्या संस्थेस आपली मालमत्ता देण्यात येऊ नये, असे शेख म्हणाले. त्यावर नरेंद्र सोनवणे, मदन गायकवाड व संजय दुसाने यांनी आक्षेप घेतला. सर्व सदस्य वेलमध्ये धाऊन आले. काहींनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला; तर नदीमुद्दीन अलीमुद्दीन या नगरसेवकाने तर चक्क अधिकाऱ्यांसमोरील टेबलावर उभे राहून गोंधळ घातला. त्यावर सेना नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृह नेता शेख कलीम शेख दिलावर यांनी मध्यस्थी करीत संबंधित नगरसेवकास आक्षेपार्ह विधान परत घेण्याचे आवाहन करीत वादावर पडदा टाकला. विषय तहकूब करण्यात आला. शहरातील प्रभाग कार्यालयात सुविधांचा अभाव व अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे नागरी सुविधा मिळत नाही. तसेच तक्रारींचे निवारण होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशी तक्रार प्रभाग सभापतींनी केली. यावर आठ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. मनपा हद्दवाढीतील ग्रामपंचायतीतील ११० कर्मचाऱ्यांपैकी ५९ कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. उर्वरित ४८ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या निश्चित किमान वेतनदराने वेतन देण्याबाबत निर्णय घेण्याचा विषय येताच पुन्हा इरफानअली आबीदअली, असलम अन्सारी, शकील जानीबेग, प्राध्यापक रिजवान खान, उपमहापौर युनुस इसा यांनी महापौर व प्रशासन धारेवर धरले. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीत किती, केव्हा व नियुक्ती कशी करण्यात आली होती, याची चौकशी झालेली नाही; मात्र प्रशासन यास प्राधान्य देत आहे. परंतु ५८ मनपा शिक्षकांबाबत प्रशासन उदासीन का, असा प्रश्न इरफानअली यांनी उपस्थित केला. या शिक्षकांपैकी काहींचे निधन झाले. त्यांचे वारस महापौरांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत न्यायाची भीक मागत आहेत. तेव्हा महापौर व प्रशासन उदासीन का होते, या विषयावर एवढी तत्परता का दाखवता, असा सवाल करीत प्रशासन जातीयवाद करीत असल्याचा उघड आरोप केला. (वार्ताहर)याप्रकरणी सदस्यांचा रोष पाहून विषय दफ्तरजमा करण्यात आला. (वार्ताहर)