शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

पावसाळ््यातही २८० गावांची तहान टँकरवर

By admin | Updated: August 5, 2014 20:27 IST

पावसाळ््यातही २८० गावांची तहान टँकरवर

 

सुनील थोरात

सिन्नरपावसाळा अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. पश्चिम पट्ट्यातील काही गावांचा अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने तालुक्याला हुलकावणी दिली आहे. परिणामी ४६ गावे व २३३ वाड्या - वस्त्यांना पाणी टंचाईने ग्रासले असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टँकरवर विसंबून राहण्याची वेळ आहे. पावसाळ््यातील पाणी टंचाईच्या या स्थितीने तालुक्यावरील दुष्काळाचे मळभ अधिक गडद झाले आहे. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नसून यंदा सलग चौथ्यावर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी तालु्क्यातील विशेषत: पूर्व भागातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना पाणी नसल्याने माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पावसाळ््यातही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरु ठेवून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने शेतकरी व सर्व आघाड्यांवर दुष्काळाचे मळभ गडद झाले आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५५७ मिलिमीटर असून आजपर्यंत सुमारे १३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या तालुक्यात १९ शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून खासगी टँकरला मंजुरी नसल्याने तालुक्यात उन्हाळ््यामध्ये सुरु असलेले ५६ खासगी टँकर बंद करण्यात आहेत. मात्र आजही तालुक्यातील ४६ गावे २३३ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी १६ टँकर कमी पडत असल्याने आजही ५५ टँकरची गरज आहे. सध्या मंजुर असलेल्या १९ टँकरपैकी सहा टँकर दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले असल्याने आता केवळ १२ टँकरवर या गावांना पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून खेपा वाढविण्यात आल्या आहेत. तालुक्यात खरिपाचे ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा या उद्दीष्टापर्यंत पोहोचने अशक्य आहे. कडधान्य वर्गातील तूर, मठ, मूग, उडीद, कुळीद या पिकांच्या पेरणीचा कालावधी संपल्याने यंदा ही पिके होणार नाहीत. पाऊस उशिरा का होईना परंतु समाधानकारक झाल्यास रब्बी हंगामाच्या पेरण्या लवकर केल्या जातील असा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाअभावी कृषि विभाग व शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजनही कोलमडले असून जुलै महिना उलटून गेला तरी अद्याप पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काही गावांमध्ये पेरण्या झाल्या आहेत. मात्र पूर्व भागात पेरण्या झाल्या नाहीत. या भागात कापूस लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. कमी पाण्यावर कापूस तग धरु शकतो. तसेच रिमझिम पाऊस सुरु राहिल्यास बाजरीच्या पेरण्यांकडे शेतकरी लक्ष केंद्रीत करणार आहे. (वार्ताहर)