शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

By admin | Updated: April 10, 2017 02:12 IST

नाशिक : सरकारमधील मंत्र्यांना निर्णयचे स्वातंत्र्य दिले नसून अजेंड्याशिवाय बैठकांमध्ये ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी व्यक्त केली.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील मंत्र्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नसून कोणत्याही मूलभूत अजेंड्याशिवाय कॅबिनेटच्या बैठकांमध्ये ऐनवेळी ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप करतानाच येत्या काळात लोकसभेसह राज्यसभेत भाजपाचे बहुमत झाल्यास या सरकारकडून घटना बदलण्याचा प्रयत्न होऊन देशातील लोकशाहीला धोका उद्भवण्याची भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक जैन सेवा कार्य समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, बेबीलाल संचेती, किसनलाल बोरा, संपतलाल सुराणा, राजेंद्र ब्रह्मेचा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. याप्रसंगी जैन समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाला मिळालेल्या मतदानाचा टक्का कमी आहे. सर्व विरोधी पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी फेरविचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून भारतीय निवडणूक प्रक्रि येत शक्य असलेल्या बदलांचा विचार होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.