शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

By admin | Updated: April 10, 2017 02:12 IST

नाशिक : सरकारमधील मंत्र्यांना निर्णयचे स्वातंत्र्य दिले नसून अजेंड्याशिवाय बैठकांमध्ये ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी व्यक्त केली.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील मंत्र्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नसून कोणत्याही मूलभूत अजेंड्याशिवाय कॅबिनेटच्या बैठकांमध्ये ऐनवेळी ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप करतानाच येत्या काळात लोकसभेसह राज्यसभेत भाजपाचे बहुमत झाल्यास या सरकारकडून घटना बदलण्याचा प्रयत्न होऊन देशातील लोकशाहीला धोका उद्भवण्याची भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक जैन सेवा कार्य समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, बेबीलाल संचेती, किसनलाल बोरा, संपतलाल सुराणा, राजेंद्र ब्रह्मेचा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. याप्रसंगी जैन समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाला मिळालेल्या मतदानाचा टक्का कमी आहे. सर्व विरोधी पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी फेरविचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून भारतीय निवडणूक प्रक्रि येत शक्य असलेल्या बदलांचा विचार होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.