शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

By admin | Updated: April 10, 2017 02:12 IST

नाशिक : सरकारमधील मंत्र्यांना निर्णयचे स्वातंत्र्य दिले नसून अजेंड्याशिवाय बैठकांमध्ये ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी व्यक्त केली.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील मंत्र्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नसून कोणत्याही मूलभूत अजेंड्याशिवाय कॅबिनेटच्या बैठकांमध्ये ऐनवेळी ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप करतानाच येत्या काळात लोकसभेसह राज्यसभेत भाजपाचे बहुमत झाल्यास या सरकारकडून घटना बदलण्याचा प्रयत्न होऊन देशातील लोकशाहीला धोका उद्भवण्याची भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक जैन सेवा कार्य समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, बेबीलाल संचेती, किसनलाल बोरा, संपतलाल सुराणा, राजेंद्र ब्रह्मेचा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. याप्रसंगी जैन समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाला मिळालेल्या मतदानाचा टक्का कमी आहे. सर्व विरोधी पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी फेरविचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून भारतीय निवडणूक प्रक्रि येत शक्य असलेल्या बदलांचा विचार होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.