शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अनकाई किल्ल्यावरील माकडे अन्न पाण्यासाठी गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:52 IST

येवला:येवला तालुक्यातील अंकाई किल्ला व परिसरातील गावाभोवती माकडांचे कळप डोंगरात पाण्याची चणचण भासताच गावाकडे कूच करत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

ठळक मुद्दे मागणी:वनविभागाने वनतळ्यातील गाळ काढण्यास परवानगी द्यावी.

वन विभाग दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वनचर, सारखे वॉटर हॉल, वनराई बंधारे, दगडी बांध यासारखे पाणी अडवण्याचे उपक्र म राबवत असते. परंतु पूर्वी अिस्तत्वात असलेले वनराई बंधारे, नाला बांध आज गाळाने व्यापलेले आहे. त्यांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात असतांनाही या मध्ये पाणी साठले जात नाही. हे वनराई बंधारे सपाट झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अडवले जात नाही. या पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. यामुळे उन्हाची लगबग सुरु होताच पाण्याची चणचण भासत आहे. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहे. डोंगरात माकडं बरोबरच खोकड, ससा, मोर, रान डुक्कर, लांडगे यासारखे प्राणी डोंगरामध्ये अिस्तत्वात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत या वन्य प्राण्यांचे प्रचंड हाल होतात. शासनाच्या वतीने नेहमीच जलसंधारणाच्या बाबतीत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार सारख्या योजना राबवल्या जातात. परंतु वन विभागामार्फत कुठल्या हि प्रकारे अश्या धरनातील गाळ काढण्याच्या योजना राबविल्या जात नाही. कित्येक वर्षापासून ह्या धरणातील गाळ काढला गेला नाही. त्यामुळे आज वनराई बंधारे खेळाच्या मैदाना सारखे सपाट झाले आहे. डोंगरात असलेल्या पाण्याची साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळे उन्हाळा सुरवात होताच पाणवठे कोरडे ठाक पडतात. आज छोट्या मोठ्या कुंड्या वन विभागाच्या मार्फत प्राण्यासाठी ठेवल्या जातात. परंतु तरीही प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्यासाठी प्राण्याची हि फरफट थांबण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. कुत्रिम पाणवठे, वनतळे वनचर उभारणी करण्यापेक्षा आहे तेच पुनर्जीवित केले तरी प्राण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. गावांमध्ये वनसंवर्धन व वन्यप्राण्याच्या बाबतीत वन समतिी स्थापन केली जाते. परंतु प्राण्यांचे प्रश्न मार्गी लावणे त्याकडे दुर्लक्ष होते. प्राण्यांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत कोणीही पाठपुरावा करत नाही. वनविभागाने वनतळ्यातील गाळ काढण्यास परवानगी दिल्यास लोकसहभागातुन हा गाळ शेतकरी निक्कच काढतील. वनतळ्यातील साठवण क्षमता वाढेल. पाणीही दिर्घ काळ टिकेल. अशी प्रतिक्र ीया डॉं प्रितम वैद्य यांनी दिली. )