शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अनकाई किल्ल्यावरील माकडे अन्न पाण्यासाठी गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:52 IST

येवला:येवला तालुक्यातील अंकाई किल्ला व परिसरातील गावाभोवती माकडांचे कळप डोंगरात पाण्याची चणचण भासताच गावाकडे कूच करत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

ठळक मुद्दे मागणी:वनविभागाने वनतळ्यातील गाळ काढण्यास परवानगी द्यावी.

वन विभाग दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वनचर, सारखे वॉटर हॉल, वनराई बंधारे, दगडी बांध यासारखे पाणी अडवण्याचे उपक्र म राबवत असते. परंतु पूर्वी अिस्तत्वात असलेले वनराई बंधारे, नाला बांध आज गाळाने व्यापलेले आहे. त्यांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात असतांनाही या मध्ये पाणी साठले जात नाही. हे वनराई बंधारे सपाट झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अडवले जात नाही. या पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. यामुळे उन्हाची लगबग सुरु होताच पाण्याची चणचण भासत आहे. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहे. डोंगरात माकडं बरोबरच खोकड, ससा, मोर, रान डुक्कर, लांडगे यासारखे प्राणी डोंगरामध्ये अिस्तत्वात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत या वन्य प्राण्यांचे प्रचंड हाल होतात. शासनाच्या वतीने नेहमीच जलसंधारणाच्या बाबतीत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार सारख्या योजना राबवल्या जातात. परंतु वन विभागामार्फत कुठल्या हि प्रकारे अश्या धरनातील गाळ काढण्याच्या योजना राबविल्या जात नाही. कित्येक वर्षापासून ह्या धरणातील गाळ काढला गेला नाही. त्यामुळे आज वनराई बंधारे खेळाच्या मैदाना सारखे सपाट झाले आहे. डोंगरात असलेल्या पाण्याची साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळे उन्हाळा सुरवात होताच पाणवठे कोरडे ठाक पडतात. आज छोट्या मोठ्या कुंड्या वन विभागाच्या मार्फत प्राण्यासाठी ठेवल्या जातात. परंतु तरीही प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्यासाठी प्राण्याची हि फरफट थांबण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. कुत्रिम पाणवठे, वनतळे वनचर उभारणी करण्यापेक्षा आहे तेच पुनर्जीवित केले तरी प्राण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. गावांमध्ये वनसंवर्धन व वन्यप्राण्याच्या बाबतीत वन समतिी स्थापन केली जाते. परंतु प्राण्यांचे प्रश्न मार्गी लावणे त्याकडे दुर्लक्ष होते. प्राण्यांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत कोणीही पाठपुरावा करत नाही. वनविभागाने वनतळ्यातील गाळ काढण्यास परवानगी दिल्यास लोकसहभागातुन हा गाळ शेतकरी निक्कच काढतील. वनतळ्यातील साठवण क्षमता वाढेल. पाणीही दिर्घ काळ टिकेल. अशी प्रतिक्र ीया डॉं प्रितम वैद्य यांनी दिली. )