शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तुरळक सरींमुळे भातपिकांना ओलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

▪️शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने समाधानाचे वातावरण देवगाव : ...

▪️शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने समाधानाचे वातावरण

देवगाव : गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी देवगाव परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. यामुळे भातपिकांना ओलावा मिळून नवसंजीवनी मिळणार असल्याने चिंतित असलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यासह दक्षिण भागातील शेतकरी बांधवांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, काही रोपे माळरानावर असल्याने त्यांना नियमित पावसाची गरज असते. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील देवगाव परिसरातील गावांमध्ये सर्वत्र कडक उन्हाने कहर केला होता, त्यामुळे उन्हामुळे पेरलेली रोपेही करपू लागली होती.

पंधरा दिवसांत पावसाचा एकही थेंब न पडल्याने लावलेली रोपे ओलाव्याअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने देवगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. पावसाच्या सरींमुळे ही पिके आता पुन्हा तग धरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर दोन-तीन दिवस पाऊस असाच कोसळत राहिला, तर उर्वरित शेतकऱ्यांची उरलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

---------------------

गत दोन वर्षी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर, त्या आधीच्या वर्षी अखेरच्या वेळी पाऊस न पडल्याने भातपीक करपून गेले होते, तर यावर्षी भात लागवडीसाठी रोपे तयार झाली असतानाही वेळेवरच पाऊस गायब झाल्याने मोठे संकट निर्माण होते. वेळेत भात लावणी न झाल्यास पिकावर परिणाम होतो. भाताची दिवस मर्यादा असल्याने काही भातपिके ९०, ११० हलवार तर काही १२०, १३५-४० गरवी पिके यामुळे जर अधिक कालावधी रोपट्यात गेल्यास त्याची उमेद तेथेच जाते. त्यामुळे शेतात लागवड केली तरी नंतर त्याची वाढ होत नाही. परिणामी दाणा पोसला जात नाही.

----------------------------

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भातपिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुसलेल्या पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने भात पिकांमध्ये ओलावा निर्माण होऊन खरीप हंगाम वाया न जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- अविनाश झोले, शेतकरी, टाकेदेवगाव. (१० देवगाव)

100721\10nsk_21_10072021_13.jpg

१० देवगाव