शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कारकिर्दीत विकास शून्य

By admin | Updated: August 1, 2016 01:20 IST

श्याम काळे : आयटकच्या जिल्हा अधिवेशनात सरकारवर टीका

नाशिक : देशातील जनतेला गुजरात मॉडेल आणि विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही करता आले नसून या सरकारमुळे केवळ अंबानी व अदानी यांच्यासारख्या उद्योजकांचाच विकास झाला असल्याचा आरोप करीत आयटकचे राज्य सरचिणीस श्याम काळे यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. द्वारका परिसरातीलकॉ. दत्ता देशमुख सभागृहात आयटकच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष दत्ता निकम, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे, स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राजू देसले, ज्योती नटराजन, सचिन पाटील, संगीता उदमले, सुनीता शर्मा, बाबासाहेब कदम, माया घोलप उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. सरकारकडून कामगारांच्या मागण्या व समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, त्यासाठी आयटक २ सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप करणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ आॅगस्टला आयटकचे सभासद रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार हे धनदांडग्या उद्योजकांसाठी काम करीत आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे देशातील संघटित व असंघटित कामगार विविध समस्यांनी ग्रासला असताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने अंतर्गत त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू देसले यांनी जिल्हा संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक व्ही. डी. धनवटे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. राजपाल शिंदे यांनी केले, तर ओंकार जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)