शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

मोदींच्या कारकिर्दीत विकास शून्य

By admin | Updated: August 1, 2016 01:20 IST

श्याम काळे : आयटकच्या जिल्हा अधिवेशनात सरकारवर टीका

नाशिक : देशातील जनतेला गुजरात मॉडेल आणि विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही करता आले नसून या सरकारमुळे केवळ अंबानी व अदानी यांच्यासारख्या उद्योजकांचाच विकास झाला असल्याचा आरोप करीत आयटकचे राज्य सरचिणीस श्याम काळे यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. द्वारका परिसरातीलकॉ. दत्ता देशमुख सभागृहात आयटकच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष दत्ता निकम, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे, स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राजू देसले, ज्योती नटराजन, सचिन पाटील, संगीता उदमले, सुनीता शर्मा, बाबासाहेब कदम, माया घोलप उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. सरकारकडून कामगारांच्या मागण्या व समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, त्यासाठी आयटक २ सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप करणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ आॅगस्टला आयटकचे सभासद रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार हे धनदांडग्या उद्योजकांसाठी काम करीत आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे देशातील संघटित व असंघटित कामगार विविध समस्यांनी ग्रासला असताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने अंतर्गत त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू देसले यांनी जिल्हा संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक व्ही. डी. धनवटे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. राजपाल शिंदे यांनी केले, तर ओंकार जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)