शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोदींच्या कारकिर्दीत विकास शून्य

By admin | Updated: August 1, 2016 01:20 IST

श्याम काळे : आयटकच्या जिल्हा अधिवेशनात सरकारवर टीका

नाशिक : देशातील जनतेला गुजरात मॉडेल आणि विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही करता आले नसून या सरकारमुळे केवळ अंबानी व अदानी यांच्यासारख्या उद्योजकांचाच विकास झाला असल्याचा आरोप करीत आयटकचे राज्य सरचिणीस श्याम काळे यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. द्वारका परिसरातीलकॉ. दत्ता देशमुख सभागृहात आयटकच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष दत्ता निकम, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे, स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राजू देसले, ज्योती नटराजन, सचिन पाटील, संगीता उदमले, सुनीता शर्मा, बाबासाहेब कदम, माया घोलप उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. सरकारकडून कामगारांच्या मागण्या व समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, त्यासाठी आयटक २ सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप करणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ आॅगस्टला आयटकचे सभासद रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार हे धनदांडग्या उद्योजकांसाठी काम करीत आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे देशातील संघटित व असंघटित कामगार विविध समस्यांनी ग्रासला असताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने अंतर्गत त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू देसले यांनी जिल्हा संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक व्ही. डी. धनवटे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. राजपाल शिंदे यांनी केले, तर ओंकार जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)