शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मोदी-पवार भेटीनेही राजकीय घडामोडीची शक्यता कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत ...

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत लाेकसभा आणि राज्यसभा अधिवेशनापूर्वी काही विषयांवर मोठे नेते चर्चा करतात हा प्रघात आहे. त्यामुळे पवार यांनी मोदी यांची भेट घेतली, त्यात अन्य विषयांवरदेखील चर्चा झाली असावी. मात्र, आणखी काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही, असे सांगून पाटील म्हणाले की, या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता कमीच आहे.

केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बोलताना दोन घटनांचा एकत्र अर्थ लावण्याचे त्यांनी खंडन केले. केवळ मुंडे यांच्याच नव्हे, तर अन्य कारखान्यांवरदेखील कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुळात पंकजा मुंडे नाराज नसून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, त्यासंदर्भात त्यांची समजूत काढल्याचे त्यांचीही पंकजाताईंनी समजूत काढली आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेबाबतही बोलताना पाटील यांनी आमचे शिवसेनेशी अथवा राष्ट्रवादीशीही वैर नाही. राज्यात होणारी आंदोलने ही सरकारच्या विरोधात असतात. उद्धव ठाकरे हे सरकारचे प्रमुख असल्याने आंदाेलने त्यांच्या विरोधात होतात, असे सांगून ते म्हणाले की, शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणुका लढविल्या आणि नंतर मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन केले, हे मान्य नाही. मात्र, येता-जाता अपमान सहन करूनही सरकार चालवताहेत, कारण सत्ता ही फेविकाॅल आहे, असे ते म्हणाले. आज तरी सेनेबरोबर सरकार स्थापन करणे शक्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

इन्फो..

ईडीच्या विषयावर सारवासारव

चूक केली नसेल तर घाबरायचे कारण नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते असे गप्पांच्या ओघात सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी नंतर मात्र सारवासारव केली. रात्रीतून अटक म्हटलो; परंतु कोणाचे नाव घेतले नव्हते. खूप जणांची चौकशी सुरू असून, ज्या अटकेच्या दिशेने आहेत, असे ते म्हणाले.

इन्फो..

राज ठाकरे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू असून, राज ठाकरे, तसेच चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात उतरल्याने युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रातीयांच्या मुद्याकडे याच दृष्टीने बघितले पाहिजे अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते असे ते म्हणाले. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.