शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-पवार भेटीनेही राजकीय घडामोडीची शक्यता कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत ...

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत लाेकसभा आणि राज्यसभा अधिवेशनापूर्वी काही विषयांवर मोठे नेते चर्चा करतात हा प्रघात आहे. त्यामुळे पवार यांनी मोदी यांची भेट घेतली, त्यात अन्य विषयांवरदेखील चर्चा झाली असावी. मात्र, आणखी काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही, असे सांगून पाटील म्हणाले की, या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता कमीच आहे.

केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बोलताना दोन घटनांचा एकत्र अर्थ लावण्याचे त्यांनी खंडन केले. केवळ मुंडे यांच्याच नव्हे, तर अन्य कारखान्यांवरदेखील कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुळात पंकजा मुंडे नाराज नसून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, त्यासंदर्भात त्यांची समजूत काढल्याचे त्यांचीही पंकजाताईंनी समजूत काढली आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेबाबतही बोलताना पाटील यांनी आमचे शिवसेनेशी अथवा राष्ट्रवादीशीही वैर नाही. राज्यात होणारी आंदोलने ही सरकारच्या विरोधात असतात. उद्धव ठाकरे हे सरकारचे प्रमुख असल्याने आंदाेलने त्यांच्या विरोधात होतात, असे सांगून ते म्हणाले की, शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणुका लढविल्या आणि नंतर मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन केले, हे मान्य नाही. मात्र, येता-जाता अपमान सहन करूनही सरकार चालवताहेत, कारण सत्ता ही फेविकाॅल आहे, असे ते म्हणाले. आज तरी सेनेबरोबर सरकार स्थापन करणे शक्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

इन्फो..

ईडीच्या विषयावर सारवासारव

चूक केली नसेल तर घाबरायचे कारण नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते असे गप्पांच्या ओघात सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी नंतर मात्र सारवासारव केली. रात्रीतून अटक म्हटलो; परंतु कोणाचे नाव घेतले नव्हते. खूप जणांची चौकशी सुरू असून, ज्या अटकेच्या दिशेने आहेत, असे ते म्हणाले.

इन्फो..

राज ठाकरे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू असून, राज ठाकरे, तसेच चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात उतरल्याने युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रातीयांच्या मुद्याकडे याच दृष्टीने बघितले पाहिजे अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते असे ते म्हणाले. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.