शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मोदी सरकारने केला भ्रमनिरास

By admin | Updated: July 12, 2014 00:26 IST

मोदी सरकारने केला भ्रमनिरास

कळवण : आमदार ए. टी. पवार यांनी कुटुंबातील कलह प्रमुख या नात्याने मिटवावे, असे भावनिक आवाहन करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कळवण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार डॉ. भारती पवार, रवींद्र देवरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, पंचायत समिती सभापती मधुकर जाधव होते. मेळाव्यात भुजबळ म्हणाले ‘अच्छे दिन आनेवाले है’चा भूलभुलय्या करून खोटी आश्वासने देत केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढले की शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटत. लगेचच निर्यातबंदी उठली जायची. तरीही जनतेने नाकारले याचे शल्य बोचत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.कादवाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, तालुकाध्यक्ष नारायण हिरे, जनार्दन भोये, चिंतामण गावित, केदा बहिरम यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला माजी सभापती कौतिक पगार, शरद गुंजाळ, उपसभापती हिरामण पगार, शंकर मराठे आदि उपस्थित होते.दिंडोरीतील मेळाव्यातही टीकाङ्क्त नरेंद्र मोदी यांनी नुसतीच स्वप्न दाखवत जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने उघडपणे अपेक्षेने भाजपाला निवडून दिले.मात्र मोदी सरकारने महागाई वाढवत कांदा निर्यात मूल्य वाढवत कांदा बटाटा जीवनावश्यक वस्तूत टाकून शेतकरी व्यापारी अशा घटकांचा विश्वासघात केल्याची टीका करत केंद्रात ‘अब कि बार महंगी सरकार’ आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिंडोरीतील मेळाव्यात सांगितले आहे.लखमापूर फाटा येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. पुढे बोलताना भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विकासाचे दावे करताना केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. जनतेच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नी वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील यांनी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, बाळासाहेब नाठे, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश वडजे, विश्वासराव देशमुख, भिका पाटील आदिंची भाषणे झाली. यावेळी कृउबा सभापती दत्तात्रय पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, वसंत वाघ उपस्थित होते. (वार्ताहर)