शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने केला भ्रमनिरास

By admin | Updated: July 12, 2014 00:26 IST

मोदी सरकारने केला भ्रमनिरास

कळवण : आमदार ए. टी. पवार यांनी कुटुंबातील कलह प्रमुख या नात्याने मिटवावे, असे भावनिक आवाहन करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कळवण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार डॉ. भारती पवार, रवींद्र देवरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, पंचायत समिती सभापती मधुकर जाधव होते. मेळाव्यात भुजबळ म्हणाले ‘अच्छे दिन आनेवाले है’चा भूलभुलय्या करून खोटी आश्वासने देत केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढले की शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटत. लगेचच निर्यातबंदी उठली जायची. तरीही जनतेने नाकारले याचे शल्य बोचत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.कादवाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, तालुकाध्यक्ष नारायण हिरे, जनार्दन भोये, चिंतामण गावित, केदा बहिरम यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला माजी सभापती कौतिक पगार, शरद गुंजाळ, उपसभापती हिरामण पगार, शंकर मराठे आदि उपस्थित होते.दिंडोरीतील मेळाव्यातही टीकाङ्क्त नरेंद्र मोदी यांनी नुसतीच स्वप्न दाखवत जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने उघडपणे अपेक्षेने भाजपाला निवडून दिले.मात्र मोदी सरकारने महागाई वाढवत कांदा निर्यात मूल्य वाढवत कांदा बटाटा जीवनावश्यक वस्तूत टाकून शेतकरी व्यापारी अशा घटकांचा विश्वासघात केल्याची टीका करत केंद्रात ‘अब कि बार महंगी सरकार’ आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिंडोरीतील मेळाव्यात सांगितले आहे.लखमापूर फाटा येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. पुढे बोलताना भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विकासाचे दावे करताना केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. जनतेच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नी वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील यांनी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, बाळासाहेब नाठे, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश वडजे, विश्वासराव देशमुख, भिका पाटील आदिंची भाषणे झाली. यावेळी कृउबा सभापती दत्तात्रय पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, वसंत वाघ उपस्थित होते. (वार्ताहर)