शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

स्वयंपाकघरात आधुनिक साधने

By admin | Updated: July 4, 2014 00:15 IST

स्वयंपाकघरात आधुनिक साधने

 

मेशी : ग्रामीण भागातील असंख्य दैनंदिन वापराच्या वस्तू कालबाह्य झाल्या असून, त्यांची जागा आधुनिक साधनांनी घेतली आहे. त्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही जाणवतात.पूर्वी प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक घरात घट्या, वरवंटा असे घट्या म्हणजे, जातं म्हणून घट्या, वरवंटा गाढवावर ठेवून विकणारी माणसं खेड्याच्या गल्लीबोळात फिरत असत. काळानुसार त्या वस्तू कालबाह्य झाल्याने विक्रेत्यांचा गावागावांत घुमणारा आवाज आता क्षीण झाला आहे. त्याऐवजी आता मिक्सरने त्याची जागा घेतली आहे. मात्र यामुळे विशिष्ट कारागीरसुद्धा आता दिसत नाही. जे आहेत त्यांना आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे लागले आहे. मात्र जुन्या कारागिरांना कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.मात्र आजी-आजोबा घरातील मंडळींना या वस्तूंची अधूनमधून आठवण करून देताना दिसतात. याशिवाय वस्तूंमुळे होणारा फायदा नव्या पिढीला समजावून सांगतात. आमच्या वेळेस वरवंट्यावर तयार केलेला मसाला अधिक चवदार असायचा असे ते आवर्जून सांगतात. पूर्वी मूग, उडीद, हरभरा यांची डाळ जात्यावर दळली जाई. आता खेड्यातही डाळ तयार करण्याची यंत्रसामग्री आली आहे. यामुळे वेळेची बचत होत असेल; परंतु तरीदेखील पूर्वीची जात्यावर दळलेली डाळ अधिक श्रेष्ठ दर्जाची कशी होती याबद्दल वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात.पूर्वीच्या घट्या, वरवंटा खडबडीत झाल्यास तो टकणारा कारागीरसुद्धा गावागावात खांद्यावर हातोडा, छन्नी घेऊन ‘घट्या टकवून घ्या हो’ अशा आवाजात फिरत असत. मात्र आता तो गल्लीबोळात घुमणारा आवाज बंद झाला आहे. काळाच्या ओघात अनेक बाबी, वस्तू कालबाह्य होत चालल्याने त्या केवळ आता जुन्या, वयस्कर वृद्धांकडूनच ऐकावयास मिळतात. (वार्ताहर)