शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नववसाहत भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:21 IST

नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : मनपाकडून जनावर मालकांवर कारवाईची मागणी

मालेगाव : नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सकाळपासून ही मोकाट जनावरे रस्त्यावर, नगर, कॉलन्यांमध्ये मोकाट फिरत असतात. जनावरांचे मालक दिवसभर या जनावरांना मोकाट सोडून देतात व सायंकाळी ही जनावरे बरोबर घरी जात असतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदर जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांकडून हल्ला होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यावर ही मोकाट जनावरे दिवसभर मध्यभागी बसून असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील सोयगाव, कॅम्प, सोमवार बाजार, सोयगाव बाजार, नववसाहत आदी भागात मोकाट जनावरांचे प्रमाण अधिक आहे. या भागातही मोकाट जनावरांकडून अनेक वेळा हल्ले झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्तकरावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.प्लॅस्टिक कचरा जनावरांच्या जिवावरपानांच्या पत्रावळीची जागा आता प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण व ग्लासने घेतली आहे, मात्र चकाचक दिसणारी पत्रावळीचे लवकर विघटन होत नसल्याने या पत्रावळीमुळे मोकाट जनावरे व पर्यावरणावर यांच्यावर विपरित परिणाम होत आहे. अन्न चिकटलेल्या पत्रावळ्या, कचरा कुंड्यांमध्ये साचलेले प्लॅस्टिकचा कचरा मोकाट जनावरांच्या जिवावर उठला आहे. प्लॅस्टिकबंदी होऊनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाकडून केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच मात्र या जनावरांचे मालक सकाळी दुभत्या जनावरांचे दूध काढून त्यांची वासरे घरी ठेवतात व गायींना दिवसभर शहरात मोकाट फिरण्यासाठी सोडून देतात. महापालिका प्रशासनाने अशा मालकांवर कारवाई करावी, नाहीतर मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे बनवावेत.- अ‍ॅड. आर. के. बच्छाव, अध्यक्ष, मालेगाव वकील संघ.मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी व वृद्ध नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रस्त्यावर जनावरांच्या झुंडीच्या झुंडी ठिय्या देऊन बसलेले असतात. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात. जनावरांची झुंज होत असते. या झुंजींमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नववसाहतीत मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. मनपाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.- प्रदीप पगार, रहिवासी.

टॅग्स :GovernmentसरकारAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार