मोबाईल बॉम्ब
नाशिक, : आजच्या आधुनिक काळात स्मार्ट मोबाइल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी ‘स्वस्तात मस्त’ अशी जाहिरात करून स्वस्तातले स्मार्ट फोन बाजारात आणल्यामुळे अनेक तरु ण या मोबाइलच्या मोहात पडताना दिसतात. मात्र हेच स्वस्तातले मोबाइल जीवावर बेतण्याइतपत महाग ठरत आहेत. अशीच एक दुर्घटना तालुक्यातील नाणेगाव पळसे येथे घडली असून, केवळ मोबाईल हातात ठेवल्याने वीज कोसळून रुपाली आगळे या तरुणीचा दूदैवी मृत्यू झाला आहे. या अगोदरही मोबाइलच्या अशा कित्येक घटना समोर आल्याने मोबाईल वापरताना पुरेशी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मोबाईल-वीस कनेक्शनखरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. जसे की एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे, एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे, ढगातून हवेकडे, ढगातून जमिनीकडे आदी. एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रि या पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने होते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट ऐकू येतो. मात्र मोबाईल जवळ बाळगल्यामुळे वीज कोसळून मृत्यू अथवा जखमी झाल्याच्या कित्येक घटना समोर येत असल्याने मोबाईलचा आणि वीजेचा संबंध तरी काय असा प्रश्न कित्येकांच्या मनात उपस्थित होत आहे. मुळात मोबाइल बॅटरीमध्ये असलेल्या लायटनिंग बोल्टमुळे वीज रेडिएशनद्वारे आकर्षित केली जाते. मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरीतील रेडिएनश फिल्ड तयार होऊन वीज कोसळते. त्यामुळे वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर शक्यतो मोबाईल दूर ठेवावा. रेडिएशनचा धोकामोबाईलमधून व्हॉइस आणि टेक्स्ट मॅसेज पाठवितांना मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग (रेडिएशन) होतो. रेडिएशनमुळे आरोग्यास होणारे धोके निश्चित झाले नसले तरी, यामुळे दुरगामी परिणाम होतात असा मतप्रवाह आहे. काही विदेशी कंपन्यांनी सतत मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले असता, रेडिएशनमुळे मेंदू आणि तोंडात गाठी निर्माण होत असल्याचा निष्कर्ष मांडला. त्याचबरोबर लहान मुलांना मोबाईल खेळण्यासाठी दिल्यास त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होत असल्याचे समोर आले. त्यामुळे मोबाईल वापरताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.