शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

By किरण अग्रवाल | Updated: July 10, 2019 09:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, शिवाय मतविभागणीवर नजर ठेवून आडाखे बांधणाऱ्यांनाही नवीन उंबरठा लाभू शकेल.

ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीत सन्मानजनक जागावाटप न झाल्यास विरोधकांमध्ये नवा पर्याय आकारास येण्याची चिन्हेलोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाºया ठरूशकतात.समविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे व राजू शेट्टी या दोघा मातब्बर नेत्यांच्या दोनदा दीर्घ बैठका झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीखेरीजचा वेगळा पर्याय मतदारांपुढे येतो की काय, याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक बनले आहे. तसे झाले, म्हणजे ‘मनसे’ व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली तर नाशिक जिल्ह्यातही काही जागांवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येऊ नये.लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, देशाची व राज्याची गणिते वेगवेगळी असतात म्हणून सारेच विरोधक पुन्हा नव्या जोमाने विधानसभेसाठीच्या तयारीला लागले आहेत. यात भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वांनाच एकत्र घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत खरे; परंतु वंचित आघाडीसारख्या पक्षांनी अवाजवी जागा मागितल्याचे पाहता त्यांची वाटचाल स्वतंत्रच राहण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतही जागा वाटपाचा तिढा नाही असे नाही, शिवाय मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यायच्या हा कळीचाच मुद्दा ठरूशकणारा आहे. पराभवाची खात्री असली तरी लढून पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठी असल्याने अन्यसमविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे व राजू शेट्टी यांच्यातील खलबतांकडे पाहता यावे. राज्यात सर्वच ठिकाणी नसला, तरी काही विशिष्ट भागात वा मतदारसंघात या दोघा नेत्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा प्रभाव नक्कीच आहे. विशेषत: राज यांचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरी भागावर राहिलेले आजवरचे लक्ष व शेट्टी यांचा कोल्हापूर, सांगलीकडील प्रभाव आणि अन्यत्रही ग्रामीण भागात पोहोचलेले संघटनात्मक कार्य पाहता, शहरी व ग्रामीण या दोघा क्षेत्रात त्यांची परस्परपूरकता उपयोगी ठरू शकेल. पारंपरिक पक्ष व त्याच त्या चेहºयांखेरीजचा पर्याय म्हणून या दोघा नेत्यांच्या सामीलकीकडे बघितले जाऊ शकते. २००९ मध्ये ‘मनसे’ने प्रथमच तब्बल १४३ जागा लढवत १३ आमदार निवडून आणले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ने २१८ तर ‘स्वाभिमानी’ने भाजपसोबत राहत १५ जागा लढविल्या होत्या. यंदा काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास या दोघांनाही जागांसाठी मोठी तडजोड करावी लागेल. तेव्हा, सर्वांसोबत जाऊन कमी जागेत जास्त यशाची अपेक्षा करण्यापेक्षा अधिक जागा लढून माफक यश मिळाले तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा विचार ते करू शकतात.
अशा स्थितीत, नाशिक जिल्ह्यातील काही जागांवर ही राजकीय दुक्कल जय-पराजयाची समीकरणे नक्कीच घडवू अगर बिघडवू शकेल. ‘मनसे’ने यापूर्वी नाशकातील तीनही जागा मिळविल्या होत्या, तर बागलाणमध्ये एकेकाळी शेतकरी संघटनेचा आमदार राहिला आहे. राज ठाकरे यांनी ‘मनसे’चा पाया विस्तारण्यासाठी मध्यंतरी केलेल्या जिल्हा दौºयात दिंडोरी, पेठ, कळवण, इगतपुरीत त्यांना मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले होते. ‘मनसे’तील स्थानिक पातळीवरील अनिल मटाले, सलीम शेख आदी नव्या नेतृत्वानेही चांगली धडपड चालविलेली दिसून येत आहे. ‘स्वभिमानी’च्या हंसराज वडघुले, कवी संदीप जगताप, नाना बच्छाव आदी तरुण फळीने कांदा आंदोलन व जिल्हा बँकेच्या सक्तीने केल्या जाऊ पाहणाऱ्या कर्ज वसुलीविरोधात संघर्ष करून पक्षाला ग्रामीण भागात बºयापैकी चेहरा प्राप्त करून दिला आहे. कर्जमुक्तीसाठी पुणतांब्यातून सुरू झालेल्या आंदोलनाला निर्णायक दिशा नाशकातून दिली गेली, त्यावेळीही ही फळी आघाडीवर होती. त्यामुळे निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाऱ्या ठरू शकतात.एकूणात, काँग्रेस आघाडीमध्ये समाधानकारक जागा मिळणार नसतील तर ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’चा एकत्रित नवा पर्याय आकारास येऊ शकतो. काही ठिकाणी मतदारांची पसंती तर काही जागांवर मतविभाजनातील हाराकिरीतून यशाचे आडाखे ते बांधू शकतात. त्यासाठी इतरांकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक ‘आयते’ गळास लागू शकतील. ‘अपक्ष’ लढण्यापेक्षा हा नवा पर्याय अनेकांना कामी येईल. ठाकरे व शेट्टी यांच्यातील वाढती ऊठबस म्हणूनच वेगळ्या वाटचालीचा संकेत देणारी म्हणता यावी.