शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

By किरण अग्रवाल | Updated: July 10, 2019 09:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, शिवाय मतविभागणीवर नजर ठेवून आडाखे बांधणाऱ्यांनाही नवीन उंबरठा लाभू शकेल.

ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीत सन्मानजनक जागावाटप न झाल्यास विरोधकांमध्ये नवा पर्याय आकारास येण्याची चिन्हेलोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाºया ठरूशकतात.समविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे व राजू शेट्टी या दोघा मातब्बर नेत्यांच्या दोनदा दीर्घ बैठका झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीखेरीजचा वेगळा पर्याय मतदारांपुढे येतो की काय, याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक बनले आहे. तसे झाले, म्हणजे ‘मनसे’ व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली तर नाशिक जिल्ह्यातही काही जागांवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येऊ नये.लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, देशाची व राज्याची गणिते वेगवेगळी असतात म्हणून सारेच विरोधक पुन्हा नव्या जोमाने विधानसभेसाठीच्या तयारीला लागले आहेत. यात भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वांनाच एकत्र घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत खरे; परंतु वंचित आघाडीसारख्या पक्षांनी अवाजवी जागा मागितल्याचे पाहता त्यांची वाटचाल स्वतंत्रच राहण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतही जागा वाटपाचा तिढा नाही असे नाही, शिवाय मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यायच्या हा कळीचाच मुद्दा ठरूशकणारा आहे. पराभवाची खात्री असली तरी लढून पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठी असल्याने अन्यसमविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे व राजू शेट्टी यांच्यातील खलबतांकडे पाहता यावे. राज्यात सर्वच ठिकाणी नसला, तरी काही विशिष्ट भागात वा मतदारसंघात या दोघा नेत्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा प्रभाव नक्कीच आहे. विशेषत: राज यांचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरी भागावर राहिलेले आजवरचे लक्ष व शेट्टी यांचा कोल्हापूर, सांगलीकडील प्रभाव आणि अन्यत्रही ग्रामीण भागात पोहोचलेले संघटनात्मक कार्य पाहता, शहरी व ग्रामीण या दोघा क्षेत्रात त्यांची परस्परपूरकता उपयोगी ठरू शकेल. पारंपरिक पक्ष व त्याच त्या चेहºयांखेरीजचा पर्याय म्हणून या दोघा नेत्यांच्या सामीलकीकडे बघितले जाऊ शकते. २००९ मध्ये ‘मनसे’ने प्रथमच तब्बल १४३ जागा लढवत १३ आमदार निवडून आणले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ने २१८ तर ‘स्वाभिमानी’ने भाजपसोबत राहत १५ जागा लढविल्या होत्या. यंदा काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास या दोघांनाही जागांसाठी मोठी तडजोड करावी लागेल. तेव्हा, सर्वांसोबत जाऊन कमी जागेत जास्त यशाची अपेक्षा करण्यापेक्षा अधिक जागा लढून माफक यश मिळाले तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा विचार ते करू शकतात.
अशा स्थितीत, नाशिक जिल्ह्यातील काही जागांवर ही राजकीय दुक्कल जय-पराजयाची समीकरणे नक्कीच घडवू अगर बिघडवू शकेल. ‘मनसे’ने यापूर्वी नाशकातील तीनही जागा मिळविल्या होत्या, तर बागलाणमध्ये एकेकाळी शेतकरी संघटनेचा आमदार राहिला आहे. राज ठाकरे यांनी ‘मनसे’चा पाया विस्तारण्यासाठी मध्यंतरी केलेल्या जिल्हा दौºयात दिंडोरी, पेठ, कळवण, इगतपुरीत त्यांना मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले होते. ‘मनसे’तील स्थानिक पातळीवरील अनिल मटाले, सलीम शेख आदी नव्या नेतृत्वानेही चांगली धडपड चालविलेली दिसून येत आहे. ‘स्वभिमानी’च्या हंसराज वडघुले, कवी संदीप जगताप, नाना बच्छाव आदी तरुण फळीने कांदा आंदोलन व जिल्हा बँकेच्या सक्तीने केल्या जाऊ पाहणाऱ्या कर्ज वसुलीविरोधात संघर्ष करून पक्षाला ग्रामीण भागात बºयापैकी चेहरा प्राप्त करून दिला आहे. कर्जमुक्तीसाठी पुणतांब्यातून सुरू झालेल्या आंदोलनाला निर्णायक दिशा नाशकातून दिली गेली, त्यावेळीही ही फळी आघाडीवर होती. त्यामुळे निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाऱ्या ठरू शकतात.एकूणात, काँग्रेस आघाडीमध्ये समाधानकारक जागा मिळणार नसतील तर ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’चा एकत्रित नवा पर्याय आकारास येऊ शकतो. काही ठिकाणी मतदारांची पसंती तर काही जागांवर मतविभाजनातील हाराकिरीतून यशाचे आडाखे ते बांधू शकतात. त्यासाठी इतरांकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक ‘आयते’ गळास लागू शकतील. ‘अपक्ष’ लढण्यापेक्षा हा नवा पर्याय अनेकांना कामी येईल. ठाकरे व शेट्टी यांच्यातील वाढती ऊठबस म्हणूनच वेगळ्या वाटचालीचा संकेत देणारी म्हणता यावी.