शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

पोटनिवडणुकीतून मनसेची एक्झिट

By admin | Updated: June 15, 2014 00:23 IST

आश्चर्य : विधानसभेसाठी ताकद राखून ठेवणार

 

नाशिक : महापालिकेच्या सत्तेसाठी एकेक नगरसेवक महत्त्वाचा असताना दोन प्रभागात सध्या होत असलेल्या पोटनिवडणुकीतून पालिकेतील सत्ताधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद टिकून राहावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, निवडणूक न लढविण्यामागे ‘कारण काय’ या प्रश्नामुळे मनसेचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.सुमारे सव्वा दोन वर्षांपूर्वी मनपाच्या झालेल्या निवडणुकीत मनसेला सर्वाधिक चाळीस जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपाने पाठिंबा दिला; परंतु तरीही बहुमताचा जादुई आकडा होत नसल्याने एकेक नगरसेवक मिळवताना मनसेला अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. दरम्यान, प्रभाग क्रमांक ६१ मधील मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या जागेवर, तर प्रभाग क्रमांक १७ चे कॉँग्रेस नगरसेवक दिनकर पाटील यांनीही राजीनामा देऊन बसपाकडून लोकसभा निवडणूक लढविताना राजीनामा दिला होता. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. परंतु या दोन्ही निवडणुकीसाठी मनसेने उमेदवारच दिला नसल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. या दोन प्रभागात मनसेचे अस्तित्व नाही अशातला भाग नाही. प्रभाग ६१ मधून हेमंत गोडसे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता या ठिकाणी धनाजी कोठुळे तसेच कॉँग्रेसने उमेदवारी नाकारलेले पोपट हगवणे इच्छुक होते. इतकेच नव्हे तर हगवणे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता; परंतु ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करू नका, असे सांगण्यात आले. प्रभाग १७ मध्ये यापूर्वी इंद्रभान सांगळे यांनी मनसेकडून उमेदवारी केली होती; परंतु निकालानंतर त्यांना विरोधकांकडून राजकीय त्रास झाल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवरही उमेदवार उभा केला नाही. तथापि, तोंडावरच विधानसभा निवडणुका असल्यामुळे ताकद राखून ठेवणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)