दोन वर्षांपूर्वी ज्या मनसेला कोणीही साथ देण्यास तयार नव्हते त्यांना भाजपाने साथ दिली आणि महापौरपद दिले. पाठोपाठ स्थायी समिती दिली. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाला शब्द देऊनही त्याचे पालन केलेले नाही. राज ठाकरे हेच शब्द पाळत नसतील तर काय करणार? लोकसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. पाठोपाठ पोटनिवडणुकीत ते साधे उमेदवार उभे करू न शकल्याने त्यांनी जनाधार गमावला आहे. आता भाजपाच्या कोणत्याही सहकार्याची अपेक्षा मनसेने करू नये.- लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजपा