शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडई पडल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST

दिल्ली येथे शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयक मगे घेण्याच्या मागणीसाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. ...

दिल्ली येथे शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयक मगे घेण्याच्या मागणीसाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.८) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध गावागावांमध्ये प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोदाकाठालगत सुमारे ४२ गावांमध्ये बंद यशस्वी होत आहे. गावांमधील शेतमालाचे सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे. बाजारपेठांमध्ये निरव शांतता पहावयास मिळत आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुद्धा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात व दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, छावा, व्यापारी महासंघ, कांदा उत्पादक संघटना, माथाडी कामगार यांनी आज कळवण बंदच्या आवाहनास मेडिकल व वैद्यकीय ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी प्रतिसाद देऊन १०० टक्के बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कळवण बाजार समितीअंतर्गत कळवण, नाकोडा, अभोणा व कनाशी येथील आवारात कांदा व भुसार लिलाव बंद ठेवून भारत बंदला पाठिंबा दिला.

दरम्यान तहसीलदार बी ए कापसे यांना बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार, शेतकरी नेते गोविंद पगार, वसाका बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे, रिपाईचे सुनील बस्ते, टिनू पगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देत केंद्र सरकारच्या कृषी कायदाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्राच्या कृषी कायदा विरोधी शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद नाशकात यशस्वी होताना दिसत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर बाजारसमिती संचालक मंडळ, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदिवला. दिंडोरी त