शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

येवल्यात जनता कर्फ्यूबाबत संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे ...

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. यात भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्रशासकीय यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बाजारपेठा, भाजीबाजारात खरेदीसाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यात सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून येत्या दोन दिवसात बडी रात असल्याने जनता कर्फ्यूबाबत मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे.

इन्फो

बाजार समितीही बंद

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही जनता कर्फ्यूदरम्यान कांदा, भाजीपाला व भुसार मालाचा लिलाव बंद ठेवल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. नियमबाह्यपणे सलग तीन दिवस बाजार समिती बंद ठेवता येत नसल्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोट....

मुळात शासन निर्बंध आणि केला जात असलेला जनता कर्फ्यू चुकीचा आहे. शासनाने कुठलाही बंद न ठेवता २४ तास दुकाने सुरू ठेवावी. त्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही. सध्या विशिष्ट वेळेत दुकाने सुरू राहत असल्याने मोठी गर्दी होऊन कोरोना वाढत आहे. जनता कर्फ्यूमुळे काही साध्य होणार नाही. उलट व्यापारी, जनता व शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार आहे.

- अ‍ॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला