शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जिल्ह्यात अल्पवयीन ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:51 IST

शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देपळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ मुलीची संख्या ४७७ अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे

नाशिक : शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़ गत चार वर्षांत शहरातील २२१, तर ग्रामीणमधील ५६९ अल्पवयीनांनी पलायन केले असून, त्यामध्ये मुलीची संख्या ४७७ असल्याची माहिती पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे़अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे असली तरी या मुलांमध्ये १८ ते २५ या वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक आहे़ या खालोखाल विवाहित स्त्री-पुरुषांची संख्या असून, शहरात गत चार वर्षांत १०९६ तरुण-पुरुष, तर १३५१ तरुणी-स्त्रिया, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७३० तरुण-पुरुष, तर ११६४ तरुणी-स्त्रियांनी पलायन केले आहे़ ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव, येवला व सिन्नर तालुक्यात पलायनाचे प्रमाण अधिक आहे़वाढते शहरीकरण तसेच एकत्रित कुटुंबपद्धती नाहीशी होत चालली असून चित्रपट, मोबाइल, विविध सोशल नेटवर्किंग साईट यामुळे मुले कुटुंबाहून अधिक वेळ मित्र-मैत्रिणी व मोबाइलमध्ये घालवितात़ अल्प काळातील मैत्रीवर विश्वास ठेवून मुली व मुले पळून जातात. त्यातील काही तरुणी काही दिवसानंतर पुन्हा पालकांकडे आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत चार वर्षांत प्रेम प्रकरणे तसेच विवाहाचे आमिष दाखवून महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे़ अल्पवयीन अर्थात सोळा ते सतरा वयोगटातील मुला-मुलींची पलायनाची आकडेवारी चिंता करण्यासारखी आहे़ पलायनाच्या घटना पाल्यांच्या चुकीमुळे होतात असे नाही, तर त्यासाठी घरातील वातावरण, आई-वडिलांचे दुर्लक्ष, मुलांना मागेल ते आणून देणे, त्यांची हौस भागवणे, संस्कारांचा अभाव, इंटरनेट, मोबाइल, चॅटिंग आदी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़