शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

जिल्ह्यात अल्पवयीन ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:51 IST

शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देपळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ मुलीची संख्या ४७७ अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे

नाशिक : शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला लावण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत़ विशेष म्हणजे पळून जाण्याच्या प्रकारांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे़ गत चार वर्षांत शहरातील २२१, तर ग्रामीणमधील ५६९ अल्पवयीनांनी पलायन केले असून, त्यामध्ये मुलीची संख्या ४७७ असल्याची माहिती पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे़अल्पवयीन मुलांच्या पलायनाची विविध कारणे असली तरी या मुलांमध्ये १८ ते २५ या वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक आहे़ या खालोखाल विवाहित स्त्री-पुरुषांची संख्या असून, शहरात गत चार वर्षांत १०९६ तरुण-पुरुष, तर १३५१ तरुणी-स्त्रिया, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७३० तरुण-पुरुष, तर ११६४ तरुणी-स्त्रियांनी पलायन केले आहे़ ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव, येवला व सिन्नर तालुक्यात पलायनाचे प्रमाण अधिक आहे़वाढते शहरीकरण तसेच एकत्रित कुटुंबपद्धती नाहीशी होत चालली असून चित्रपट, मोबाइल, विविध सोशल नेटवर्किंग साईट यामुळे मुले कुटुंबाहून अधिक वेळ मित्र-मैत्रिणी व मोबाइलमध्ये घालवितात़ अल्प काळातील मैत्रीवर विश्वास ठेवून मुली व मुले पळून जातात. त्यातील काही तरुणी काही दिवसानंतर पुन्हा पालकांकडे आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत चार वर्षांत प्रेम प्रकरणे तसेच विवाहाचे आमिष दाखवून महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे़ अल्पवयीन अर्थात सोळा ते सतरा वयोगटातील मुला-मुलींची पलायनाची आकडेवारी चिंता करण्यासारखी आहे़ पलायनाच्या घटना पाल्यांच्या चुकीमुळे होतात असे नाही, तर त्यासाठी घरातील वातावरण, आई-वडिलांचे दुर्लक्ष, मुलांना मागेल ते आणून देणे, त्यांची हौस भागवणे, संस्कारांचा अभाव, इंटरनेट, मोबाइल, चॅटिंग आदी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़