शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

भटक्यांसाठी असावे मंत्रालय

By admin | Updated: January 16, 2017 01:43 IST

ठराव : भटक्या विमुक्तांच्या दहाव्या संमेलनाचा समारोप

नाशिक : विमुक्त जाती, भटक्या जमातीचे प्रश्न सोडविण्यासाठी भटक्यांचे स्वतंत्र मंत्रालय असावे, असा ठराव करण्याबरोबरच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरण जाहीर करावे, अशी मागणी भटक्या विमुक्तांच्या संमेलनात करण्यात आली. क्रांतिवीर वसंतराव नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात भटक्या विमुक्तांच्या संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘भटक्या विमुक्त महिलांचा सर्वांगीण विकास शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या दुर्लक्षामुळे होत नाही हे खरे आहे काय?’ या विषयावर परिसंवादात विचारमंथन झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अ‍ॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी त्यांचे विचार मांडताना समाजाच्या तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार शिक्षण आदि विविध विषयांविषयीच्या ज्ञानाचा प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून, त्यासाठी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे.