शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:30 IST

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निर्णय निर्यात वाढ होऊन दर स्थिर होण्याची शक्यता

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जानेवारीच्या तिसºया सप्ताहात केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे गेला सप्ताहभर कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले. परंतु श्रीलंकावगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नव्हती. यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य हटवण्यात यावे यासाठी राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनीही केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.नोव्हेंबरअखेरपर्यंत देशात कांद्याचा दर सरासरी ३५ रु पये किलो पातळीवर होता. तेव्हा सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणून किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले होते. त्यानंतर ते ७०० डॉलर प्रतिटन असे खाली आले. तर आता कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्यात आल्याने कांद्याची निर्यात सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर वाढू शकतील.कृषि व प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या आकडेवारीनुसार सन २०१७ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत देशातून १.०३ दशलक्ष टन कांद्याची निर्यात झाली होती. २०१६ साली याच कालावधीत देशातून १.३७ दशलक्ष टन कांदा निर्यात करण्यात आला होता. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशाने ३०.६८ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला गेला आहे.वर्षनिहाय झालेली निर्यात२००९ -१० - १८.७३ लाख टन२०१०-११ - १३.४० लाख टन२०११-१२ - १५.५२ लाख टन२०१२ -१३ - १८.२२ लाख टन२०१३ -१४ - १३.५० लाख टन२०१४ - १५ .- १०.८६ लाख टन२०१५ -१६ - १९.१४ लाख टनआॅक्टोबर २०१७ पर्यंत - १.०३ लाख टनकांद्याचे भाव कोसळत असताना योग्यवेळी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकºयांना दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे कांद्याचे कोसळणारे भाव थांबण्यास मदत होईल.- नानासाहेब पाटील, संचालक नाफेडसर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून

 भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो.जिल्ह्यातून ७५ टक्के यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. यापैकी ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यापूर्वी किमान निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर निर्यातीमध्ये भरघोस वाढ झालेली होती.