शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मिनी मंत्रालय होणार मोठे; गट अकराने, तर गण २२ ने वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:27 IST

राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : जागा वाढल्याने मोठा दिलासा

नाशिक : राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे सध्याचे ७३ गट असून, पंचायत समितीचे १४६ गण आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन महापालिका, आठ नगरपालिका, सात नगरपंचायती असून शहरी भाग वगळता ग्रामीण भागात जिल्हा परिषद हीच एकमेव मोठी संस्था कार्यरत आहे. सुमारे ४० लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतानाच त्यांच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, विकास कामांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर निश्चित करण्यात आली असली तरी, पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी रचना करण्यात आली आहे. साधारणत: चाळीस गावे मिळून एक जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणासाठी दहा ते बारा गावे गृहित धरण्यात आली आहेत. मात्र गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातील लोकसंख्याही वाढली आहे. त्या प्रमाणात मिनी मंत्रालयात प्रतिनिधीत्व वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

------------

 

जिल्हा परिषदेची पुढीलवर्षी निवडणूक

 

* नाशिक जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे.

 

* सध्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक वेळेवर घेण्याच्यादृष्टीने प्रभाग रचना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील.

 

--------------

 

गट कुठे, किती वाढणार...

 

* नाशिक जिल्हा परिषदेच्या हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता, त्याआधारे शासन निर्णयानुसार गटांची संख्या वाढणार आहे.

 

* प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

-------------

 

पंचायत समित्यांची निवडणूक सोबतच

 

* जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा आजवरचा प्रघात आहे.

 

* एका गटाच्या अखत्यारित दोन गण असतात. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीसाठी मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागते.

 

* नाशिक जिल्ह्यातील ओझर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याने ओझरचा गट या निवडणुकीत नसेल. त्याऐवजी दुसरा गट तयार होईल.

 

------------

 

असे आहेत गट-गण...

 

* बागलाण- ७ - १४

* मालेगाव- ७ -१४

* देवळा- ३- ६

* कळवण- ४-८

* सुरगाणा- ३- ६

* पेठ- २-४

* दिंडोरी- ६- १२

* चांदवड- ४-८

 

* नांदगाव- ४-८

 

* येवला- ५-१०

 

* निफाड- १०-२०

 

* नाशिक- ४-८

 

* त्र्यंबकेश्वर- ३-६

 

* इगतपुरी- ५-१०

 

* सिन्नर- ६-१२

 

-------------

 

दहा वर्षांत जिल्ह्यात ५ टक्क्याने लोकसंख्या वाढली.

 

* सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३४,९९,७९२ गृहित धरली होती.

 

* सन २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही, परंतु एकूण जन्माचे प्रमाण पाहता, सुमारे पाच टक्के लोकसंख्या वाढीचा अंदाज धरण्यात आला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक