शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मिनी मंत्रालय होणार मोठे; गट अकराने, तर गण २२ ने वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:27 IST

राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : जागा वाढल्याने मोठा दिलासा

नाशिक : राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे सध्याचे ७३ गट असून, पंचायत समितीचे १४६ गण आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन महापालिका, आठ नगरपालिका, सात नगरपंचायती असून शहरी भाग वगळता ग्रामीण भागात जिल्हा परिषद हीच एकमेव मोठी संस्था कार्यरत आहे. सुमारे ४० लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतानाच त्यांच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, विकास कामांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर निश्चित करण्यात आली असली तरी, पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी रचना करण्यात आली आहे. साधारणत: चाळीस गावे मिळून एक जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणासाठी दहा ते बारा गावे गृहित धरण्यात आली आहेत. मात्र गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातील लोकसंख्याही वाढली आहे. त्या प्रमाणात मिनी मंत्रालयात प्रतिनिधीत्व वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

------------

 

जिल्हा परिषदेची पुढीलवर्षी निवडणूक

 

* नाशिक जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे.

 

* सध्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक वेळेवर घेण्याच्यादृष्टीने प्रभाग रचना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील.

 

--------------

 

गट कुठे, किती वाढणार...

 

* नाशिक जिल्हा परिषदेच्या हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता, त्याआधारे शासन निर्णयानुसार गटांची संख्या वाढणार आहे.

 

* प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

-------------

 

पंचायत समित्यांची निवडणूक सोबतच

 

* जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा आजवरचा प्रघात आहे.

 

* एका गटाच्या अखत्यारित दोन गण असतात. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीसाठी मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागते.

 

* नाशिक जिल्ह्यातील ओझर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याने ओझरचा गट या निवडणुकीत नसेल. त्याऐवजी दुसरा गट तयार होईल.

 

------------

 

असे आहेत गट-गण...

 

* बागलाण- ७ - १४

* मालेगाव- ७ -१४

* देवळा- ३- ६

* कळवण- ४-८

* सुरगाणा- ३- ६

* पेठ- २-४

* दिंडोरी- ६- १२

* चांदवड- ४-८

 

* नांदगाव- ४-८

 

* येवला- ५-१०

 

* निफाड- १०-२०

 

* नाशिक- ४-८

 

* त्र्यंबकेश्वर- ३-६

 

* इगतपुरी- ५-१०

 

* सिन्नर- ६-१२

 

-------------

 

दहा वर्षांत जिल्ह्यात ५ टक्क्याने लोकसंख्या वाढली.

 

* सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३४,९९,७९२ गृहित धरली होती.

 

* सन २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही, परंतु एकूण जन्माचे प्रमाण पाहता, सुमारे पाच टक्के लोकसंख्या वाढीचा अंदाज धरण्यात आला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक