शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी धान्य वाहतुकीतून लाखोंचा फटका

By admin | Updated: August 2, 2015 00:13 IST

काळ्याबाजाराची भीती : ‘द्विस्तरीय वितरण’चा ठेका घेण्यास नकार

नाशिक : अन्नधान्य महामंडळातून थेट धान्याची उचल करून शासकीय गुदामापर्यंत व तेथून पुन्हा रेशन दुकानदाराच्या दाराशी नेण्याच्या ‘द्विस्तरीय वितरण’ प्रणाली खासगी वाहतूक ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्याचा आग्रह धरणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा निर्णय अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली असून, वाहतूक ठेकेदार नेमण्यासाठी घालून दिलेल्या अटी-शर्तींचा विचार करता त्यासाठी पात्र ठेकेदारच पुढे येत नसल्याने राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये खासगी वाहनांद्वारे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धान्य वाहतूक करावी लागत आहे व त्यातून दरमहा लाखो रुपयांचा फटकाही शासनालाच सहन करावा लागत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्य महामंडळाच्या गुदामातून शासकीय गुदामात धान्य पोहोचविणे व तेथून पुन्हा रेशन दुकानदारापर्यंत नेण्यासाठी एकच वाहतूक ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वाहतूक ठेकेदारामार्फत फक्त शासकीय गुदामापर्यंतच धान्य पोहोचविले जाते व तेथून रेशन दुकानदार आपल्या वाहनातून नेत आहे. शासनाच्या मते रेशन दुकानदाराकडून शासकीय गुदामातून उचललेले धान्य दुकानात न जाता त्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने थेट त्याच्या दुकानापर्यंत धान्य पोहोचविल्यास या साऱ्या प्रकाराला आळा बसेल, त्यामुळे एकाच वाहतूक ठेकेदारामार्फत हे काम केले जाणे क्रमप्राप्त असल्याचे मानून असा वाहतूक ठेकेदार नेमण्यासाठी काही अटी-शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांची अनामत भरणे, ठेकेदाराकडे किमान शंभराहून अधिक स्वत:ची वाहने असणे, धान्य वाहतुकीचा अनुभव असणे अशा किचकट बाबींचा समावेश आहे. राज्यस्तरावर यासंदर्भातील ठेका काढण्यात येत असल्याने नाशिकसह किमान दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे ठेका घेण्यास एकही ठेकेदार पुढे आलेला नाही. शासनाने याबाबत वेळोवेळी मुदतवाढ देऊनही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही, परिणामी त्या त्या जिल्ह्याने खासगी वाहने अधिग्रहीत करून दरमहा धान्याची वाहतूक सुरू ठेवली आहे. खासगी वाहनांना दररोजचे भाडे ठरविण्यात येऊन महिनाअखेरीस त्याचे देयक अदा केले जात असले तरी, शासनाच्या वाहतूक ठेकेदाराच्या तुलनेत दरमहा दहा ते पंधरा लाख रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. त्यात शासनाचेच आर्थिक नुकसान होत आहे.