शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: June 2, 2017 01:22 IST

पंचवटी : शेतकऱ्यांनी कर्जमाफी ,विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संप पुकारल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी गुरुवार (दि.१)पासून संप पुकारल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर झाला. दररोज शेतकरी व शेतमालाने फुलणारी बाजार समिती गुरुवारी सकाळपासून पूर्णपणे ओस पडलेली होती. या दिवशी बाजार समितीत कोणत्याही प्रकारचा शेतमाल दाखल झाला तर नाहीच, परंतु कोणत्याही प्रकारचे व्यवहार न झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंदाचे अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. गुरुवारपासून शेतकरी संपावर जाणार असल्याने दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फळ व पालेभाज्यांची आवक वाढलेली होती. बाजार समितीत दैनंदिन पाच ते साडेपाच हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल होतो. दोन दिवसांपूर्वी आवक वाढल्याने साधारणपणे एक हजार क्विंटलपर्यंत शेतमालाची आवक वाढलेली होती. दैनंदिन बाजार समितीत अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होत असते मात्र गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची उलाढाल झाली नाही. बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे गाळे पूर्णपणे बंद होते, तर आवारात स्मशानशांतता पसरलेली होती. येथे काम करणारे हमाल काम नसल्याने दुकानांच्या बंद गाळ्यांसमोरे बसलेले होते. व्यवहार पूर्णपणे बंद असल्याने परिसरातील हॉटेल्स तसेच अन्य विविध वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत नव्हती.दररोज शेतकरी व शेतमालाने फुलणारे पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार गुरुवारी सकाळपासून असे पूर्णपणे ओस पडले होते.