शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार मालेगावला शेतकºयांची रक्कम थकली : व्यापारी बांगलादेशला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:41 IST

नाशिक : दोन महिन्यांत शेतकºयांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी करून बांगलादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतकºयांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांना साकडे घातले आहे

ठळक मुद्देसंपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणेशेतकरी आत्महत्या करण्याची भीती

नाशिक : दोन महिन्यांत शेतकºयांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी करून बांगलादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतकºयांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांना साकडे घातले आहे. मालेगाव तालुक्यातील शिवाजी सूर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रुपये शेतकºयांना देणे असताना सूर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापाºयाला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून, अद्यापही तेथून परत आलेले नसल्याचे व त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. शेतकºयांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रुपये वसूल करून शेतकºयांना वाटप केले. परंतु तरीही अन्य शेतकºयांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भीती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकीची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामिनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारली असल्याने त्यांचा उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु निव्वळ मालमत्तेवर बोजा चढवून शेतकºयांची रक्कम वसूल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सूर्यवंशी व जामिनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.