शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

दूध, भाजीपाल्याची आधीच साठवणूक

By admin | Updated: June 3, 2017 00:35 IST

नाशिक : आधाराश्रम, महिलाश्रम आदि सामाजिक संस्था आदि ठिकाणी भाजीपाला व दुधाची तजवीज करून ठेवल्यामुळे हाल झाले नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाची पूर्वकल्पना असल्याने आधाराश्रम, महिलाश्रम आदि सामाजिक संस्था, जिल्हा रुग्णालय आदि ठिकाणी भाजीपाला व दुधाची तजवीज करून ठेवल्यामुळे फारसे हाल झाले नसल्याचे दिसून येत आहे. आधाराश्रमात ३ ते ५ दिवसांचा भाजीपाला आगाऊ खरेदी करून ठेवण्यात आला असून, नियमित दुधाचा रतीब सुरू असल्याने दुधाचीही अडचण भासली नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाभरातून निरनिराळ्या आजारांवरील उपचारासाठी, अपघात, बाळांतपण आदि कारणांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचीही जेवण, दूध, चहा याबाबत गैरसोय झाली नाही. जिल्हा रुग्णालयात दूध पुरवठा करणाऱ्या नियमितच्या दूधवाल्याव्यतिरिक्त संपामुळे अज्ञात व्यक्तीने मोफत मोठी किटली भरून दूध आणून दिले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बालविभागाला सध्यातरी दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांचा संप आणखी काही दिवस चालला तर मात्र गैरसोय होऊ शकते, अशी शक्यता या संस्थांकडून वर्तविण्यात आली आहे. अशीच माहिती गणेशवाडीतील अवेकनिंग जागृती या अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेतर्फे देण्यात आली. या संस्थेत सध्या ४० मुले असून, लक्ष्मीनारायण चॅरिटेबल संस्थेतर्फे मुलांसाठी नास्टा, जेवण दिले जाते. भाज्यांचा तुटवडा झाल्यास मात्र परिस्थिती अवघड होऊ शकते असे सांगण्यात आले.