शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

ग्रामीण भागात दूध टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:07 IST

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देहिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.पूर्वीच्या माणसाची म्हण होती की घर तेथे खुटा म्हणजे प्रत्येक घरापुढे गायी, म्हशी, बैल असे पशुधन असले पाहिजे. अगदी राजे-महाराज यांच्या काळापासून वाड्यात गायी, म्हशी, पाळण्याची प्रथा प्रचलित होती. पूर्वी कोरड व्हावु शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. गावात अगदी मोजक्याच लोकांकडे अल्प प्रमाणात बागयती शेती होती. पावसाचे प्रमाण भरपूर असायचे, त्यामुळे गुरांना चरण्यासाठी रानात मोबलक चारा असायचा. शेतीशी निगडित दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असे.मोठ्या शेतकऱ्याकडे गुरे चारण्यासाठी घरातील किंवा सालाने एक माणूस राहत असायचा. त्यामुळे दूध मोठ्या प्रमाणात मिळत होते. गावातील ज्या लोकांकडे गायी असे त्या गावातील एक माणूस गायी चारण्यासाठी नेत असे त्यास गवाऱ्या म्हटले जात असे. त्याला गायी चारण्याचा मोबदला म्हणून पैसे, किंवा धान्य दिले जात होते.विज्ञान युगामध्ये शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. जिरायती शेतीचे बागायती झाली. त्यामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी-कमी होत चालल्याने चारा टंचाई जाणवू लागला आहे. गायी-म्हशींचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा -वीस गायी असायच्या त्यांच्याकडे आता एक किंवा दोन गायी-म्हशी आहेत.पूर्वी भरपूर प्रमाणात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जात असे. दुधाचे पैसे हे आठवडयाला किंवा महिन्याला मिळतात. या दुधाच्या आलेल्या पैशातून शेतीतील माणसाची मजुरी, पिकासाठी औषधे व त्यांचा प्रपंच दुधाच्या येणाºया पैशातुन चालत असे. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहत नाही. त्यामुळे दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील झाल्याने गायी-म्हशी कमी झाल्या. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरात फ्रिज आल्याने तसेच बाजारात दुधाच्या पिशव्या मिळू लागल्याने दूध व्यवसायाकडे शेतकºयांने पाठ फिरवल्यामुळे दूधटंचाई जाणवू लागली आहे. (फोटो ०५ दुध, ०५ दुध १))