शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात दूध टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:07 IST

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देहिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील

खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे.पूर्वीच्या माणसाची म्हण होती की घर तेथे खुटा म्हणजे प्रत्येक घरापुढे गायी, म्हशी, बैल असे पशुधन असले पाहिजे. अगदी राजे-महाराज यांच्या काळापासून वाड्यात गायी, म्हशी, पाळण्याची प्रथा प्रचलित होती. पूर्वी कोरड व्हावु शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. गावात अगदी मोजक्याच लोकांकडे अल्प प्रमाणात बागयती शेती होती. पावसाचे प्रमाण भरपूर असायचे, त्यामुळे गुरांना चरण्यासाठी रानात मोबलक चारा असायचा. शेतीशी निगडित दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असे.मोठ्या शेतकऱ्याकडे गुरे चारण्यासाठी घरातील किंवा सालाने एक माणूस राहत असायचा. त्यामुळे दूध मोठ्या प्रमाणात मिळत होते. गावातील ज्या लोकांकडे गायी असे त्या गावातील एक माणूस गायी चारण्यासाठी नेत असे त्यास गवाऱ्या म्हटले जात असे. त्याला गायी चारण्याचा मोबदला म्हणून पैसे, किंवा धान्य दिले जात होते.विज्ञान युगामध्ये शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. जिरायती शेतीचे बागायती झाली. त्यामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी-कमी होत चालल्याने चारा टंचाई जाणवू लागला आहे. गायी-म्हशींचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा -वीस गायी असायच्या त्यांच्याकडे आता एक किंवा दोन गायी-म्हशी आहेत.पूर्वी भरपूर प्रमाणात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जात असे. दुधाचे पैसे हे आठवडयाला किंवा महिन्याला मिळतात. या दुधाच्या आलेल्या पैशातून शेतीतील माणसाची मजुरी, पिकासाठी औषधे व त्यांचा प्रपंच दुधाच्या येणाºया पैशातुन चालत असे. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहत नाही. त्यामुळे दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाºयांचा प्रश्न निर्माण झाल्याने दुभती जनावरे पाळणे मुश्कील झाल्याने गायी-म्हशी कमी झाल्या. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरात फ्रिज आल्याने तसेच बाजारात दुधाच्या पिशव्या मिळू लागल्याने दूध व्यवसायाकडे शेतकºयांने पाठ फिरवल्यामुळे दूधटंचाई जाणवू लागली आहे. (फोटो ०५ दुध, ०५ दुध १))