शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ब्रिटिशकालीन वास्तूमधून पश्चिम वनविभागाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची ...

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची वास्तू इ.स.१९२० सालापूर्वीचे बांधकाम असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. वनखाते हे ब्रिटिशकालीन खाते म्हणून आजही ओळखले जाते. या खात्याचे नाशिकचे रेंज कार्यालय १९२० साली ब्रिटिशांकडून हस्तांतरित करण्यात आले होते. वीटा, दगड मातीमधील हे बांधकाम काळानुरूप जीर्ण झाले असून, ठिकठिकाणी पडझड सुरू झाल्यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रशासनाने हे कार्यालयात ‘वन भवन’ अस्तित्वात येईपर्यंत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.

उंटवाडी येथील विश्रामगृहाच्या आवारातील सभागृहात कार्यालयीन लिपिक वर्गाचे टेबल, तसेच पाठीमागील आवारात असलेल्या खोल्यांमध्ये वनक्षेत्रपाल, वनपाल, रेस्क्यू टीमचे कार्यालय विकसित करण्यात आले आहे, तसेच मुख्य विश्रामगृहाच्या तळमजल्यावर उपवनसंरक्षकांचे दालन विकसित करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील विश्रामखोल्या ‘जैसे-थे’ ठेवण्यात आल्या आहेत. सहायक वनसंरक्षकांचेही कार्यालयत नव्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे.

या जागेवर ‘वनभवन’ साकारण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. वनभवनाच्या एकाच इमारतीत पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय राहणार आहे. वनभवनाची अद्ययावत सुसज्ज वास्तू साकारण्याचा प्रस्ताव नव्याने मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

180721\034618nsk_41_18072021_13.jpg

वनविश्रामगृहातील वनपालांचे नवे कार्यालय