शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कुटुंबीयांसह विद्यार्थ्यांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षीही दोन ते तीन टक्क्यांनी घट होण्याचे ...

नाशिक : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षीही दोन ते तीन टक्क्यांनी घट होण्याचे संकेत दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यातून गतवर्षी सुमारे ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ७५ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यावर्षी परीक्षेाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतच जवळपास दोन ते अडीच टक्क्यांनी घट झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरात गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून अनेक कुटुंब स्थलांतरित होऊन मूळ गावी परतले. यात परप्रांतीय कुटुंबाचाही समावेश होता. अशा परप्रांतीय स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांसमवेत विद्यार्थीही स्थलांतरित झाल्याने परीक्षार्थींच्या संख्येत घट झाल्याचा अंदाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटात बारावीच्या परीक्षा झाल्या असल्या तरी दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला होता. यावर्षीही ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा संसर्ग राज्यभर वाढला आहे. नाशकात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनामुळे यावर्षी शाळा बंद राहिल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पुढे ढकण्यात आल्या असून सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणीसाठी अजूनही मुदत असून परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करणे शक्य आहे. त्यामुळे सध्याच्या आकड्यात वाढ होणार असली तरी ही वाढ अत्यल्प प्रमाणात राहण्याचे संकेत आहेत.

--

पॉईंटर

२९ एप्रिल ते २० मे २०२१

२३ एप्रिल ते २१ मे २०२१

दहावीचे विद्यार्थी

२०२०- ९७९१२,

२०२१- ९५७३४

बारावीचे विद्यार्थी

२०२०- ७५३४३,

२०२१- ७४४०३

दहावी पुनर्परीक्षार्थी -२७२०

बारावीचे पुनर्परीक्षार्थी -१५७३

---

दहावी बारावीचे किती विद्यार्थी यंदा परीक्षा देतील हा आकडा आजच सांगणे कठीण

आहे. कारण परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षण मंडळाकडून परीक्षार्थींची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत हे आताच सांगणे कठीण आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

--

नियमित विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थींची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये कुटुंबाला मदतीसाठी धावल्याने शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. पुन्हा कोरोनाचे संकट ओढवले असून, लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींची संख्या घटणार आहे.