शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

३५ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:08 IST

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराने शेतीसह दात्याणेत पूल, रस्ता गेला वाहून

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.कसबे व मौजे सुकेणेसह बाणगंगा काठच्या दीक्षी, दात्याणे, काटवन, थेरगाव, ओणे या गावांना बाणगंगेच्या महापुराचा तडाखा बसला आहे. कसबे सुकेणे येथील पूररेषेतील जोशीवाडा, भिलाटी येथील जवळपास ३५ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. या पूरग्रस्तांना दाऊदशहावली बाबा मंदिर व दशक्रिया विधी शेडमध्ये निवास व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे.सामाजिक कार्यकर्ते रतन शेवकर, तलाठी कार्यालय व ग्रामपालिकेने पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सोमवारी कसबे सुकेणे येथील पूररेषेअंतर्गत येणाºया नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर कसबे सुकेणेच्या तलाठी श्रीमती के.एम. पवार, सचिन कुलथे, रेशन दुकानदार अनिल नळे, ग्रामदक्षता दलाचे सचिन कुलथे, परेश भार्गवे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, स्वाती आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी शांताराम धुळे, जगन्नाथ जाधव, मेघनाथ हिरे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिरासमोरील हॉटेल व टपºया, दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्याचे नव्याने केलेले डांबरीकरण वाहून गेले असून, सर्वत्र गाळ साचला आहे.जिल्हा प्रशासन फिरकलेच नाहीरविवारच्या पूरस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासन केवळ चांदोरी-सायखेड्यात तळ ठोकून होते. कसबे-सुकेणे येथील व परिसरात एकही वरिष्ठ अधिकारी किंवा आपत्ती निवारण पथक फिरकले नसल्याची माहिती पूरग्रस्तांनी दिली. महापूर म्हणजे केवळ सायखेडा, चांदोरी अशी धारणा जिल्हा प्रशासनाची झाली आहे. रविवारी सुकेणेसह तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला होता. चाटोरी, गोंडेगाव, शिरसगाव, शिंगवे, करंजगाव या गावात प्रशासन पोहोचले नसल्याचा आरोप होत आहे. केवळ चांदोरी बोटीमधून फिरून फोटोसेशन करून तालुक्याच्या पूरस्थितीचा अंदाज घेणाºया मंत्री, अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. शेती गेली वाहून...मौजे सुकेणे येथील स्मशानभूमी- जवळील दिलीप माधवराव मोगल यांची सुमारे पाच गुंठे शेती बाणगंगेच्या पुरात पिकासह वाहून गेली आहे. शिवारातील द्राक्ष, टमाटा, फ्लॉवर, सोयाबीन पिके अजूनही पाण्याखाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.दात्याणे पूलगेला वाहूनदात्याणे गावातील गुरगुडे-पवार-धनवटे वस्तीला व खेरवाडी शिवाराला जोडणारा मुख्य पूल बाणगंगा महापुरात वाहून गेला असून, या भागाचा संपर्क तुटला आहे.