शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३५ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:08 IST

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराने शेतीसह दात्याणेत पूल, रस्ता गेला वाहून

कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासित झाली असून, मौजे सुकेणेत एका शेतकऱ्याची पाच गुंठे शेती तर दात्याणे येथे पूल वाहून गेला आहे.कसबे व मौजे सुकेणेसह बाणगंगा काठच्या दीक्षी, दात्याणे, काटवन, थेरगाव, ओणे या गावांना बाणगंगेच्या महापुराचा तडाखा बसला आहे. कसबे सुकेणे येथील पूररेषेतील जोशीवाडा, भिलाटी येथील जवळपास ३५ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. या पूरग्रस्तांना दाऊदशहावली बाबा मंदिर व दशक्रिया विधी शेडमध्ये निवास व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे.सामाजिक कार्यकर्ते रतन शेवकर, तलाठी कार्यालय व ग्रामपालिकेने पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सोमवारी कसबे सुकेणे येथील पूररेषेअंतर्गत येणाºया नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर कसबे सुकेणेच्या तलाठी श्रीमती के.एम. पवार, सचिन कुलथे, रेशन दुकानदार अनिल नळे, ग्रामदक्षता दलाचे सचिन कुलथे, परेश भार्गवे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, स्वाती आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी शांताराम धुळे, जगन्नाथ जाधव, मेघनाथ हिरे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिरासमोरील हॉटेल व टपºया, दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्याचे नव्याने केलेले डांबरीकरण वाहून गेले असून, सर्वत्र गाळ साचला आहे.जिल्हा प्रशासन फिरकलेच नाहीरविवारच्या पूरस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासन केवळ चांदोरी-सायखेड्यात तळ ठोकून होते. कसबे-सुकेणे येथील व परिसरात एकही वरिष्ठ अधिकारी किंवा आपत्ती निवारण पथक फिरकले नसल्याची माहिती पूरग्रस्तांनी दिली. महापूर म्हणजे केवळ सायखेडा, चांदोरी अशी धारणा जिल्हा प्रशासनाची झाली आहे. रविवारी सुकेणेसह तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला होता. चाटोरी, गोंडेगाव, शिरसगाव, शिंगवे, करंजगाव या गावात प्रशासन पोहोचले नसल्याचा आरोप होत आहे. केवळ चांदोरी बोटीमधून फिरून फोटोसेशन करून तालुक्याच्या पूरस्थितीचा अंदाज घेणाºया मंत्री, अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. शेती गेली वाहून...मौजे सुकेणे येथील स्मशानभूमी- जवळील दिलीप माधवराव मोगल यांची सुमारे पाच गुंठे शेती बाणगंगेच्या पुरात पिकासह वाहून गेली आहे. शिवारातील द्राक्ष, टमाटा, फ्लॉवर, सोयाबीन पिके अजूनही पाण्याखाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.दात्याणे पूलगेला वाहूनदात्याणे गावातील गुरगुडे-पवार-धनवटे वस्तीला व खेरवाडी शिवाराला जोडणारा मुख्य पूल बाणगंगा महापुरात वाहून गेला असून, या भागाचा संपर्क तुटला आहे.