शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:55 IST

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

ठळक मुद्दे पेठ तालुक्यातील गावे लागली होरपळू; रोजगाराकरीता भटकंती सुरु

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

मातुलेस्वर पटांगनाचा, दुष्काळात जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात व आजूबाजूच्या परिसरात पेठ हरसूल या तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंब स्थलांतरित होताना दिसताहेत असेच मातोरी गावातील मातुलेस्वर पटांगणात गेल्या दहा बारा दिवसापासून राहत असलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असे समजले कि पेठ तालुक्यातील गोटविहीर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण गैरसोय असल्याने तेथील सुमारे दोनशे लोकांनी आपल्या कुटुंबासह गाव सोडण्याचा निर्णय घेतला, गावात पाणी नाही चार ते पाच किलोेमिटर वरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याने जगायचे कसे व कुटुंबाला जगवायचे कसे हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुटुंबाला घेऊन गावातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींनी गावातून काढता पाय घेत गावोगावी रोजंदारीवर काम करत उदरनिर्वाह करत आहेत.गावातील बहुतेक नागरिकांची मुले हि शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत परीक्षा संपून बहुतेक मुले सुट्यांमध्ये गावाकडे परतली आहेत, दरसाल सट्टीत मुलांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या मते मुले आश्रमशाळेतच सुखी होते. गावाकडे पाणी नसल्याने आपल्याबरोबरीने त्यांनाही गावोगावी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, आज मातोरीत दिवसभर मिळेल ते काम करून हि मंडळी आपले जगण्याचे साधन करत आहे.१) आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर दमण नदी आहे, पण गावात पाणीपुरवठा नाही. पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याने आम्ही आमची मुले घेऊन नाशिकला आलो आहोत.- संतोष भसरे (बोर पाडा)२) हंडाभर पाण्यासाठी खूप वनवन करायला लागत असल्याने खूप त्रास होतो, पूर्ण गावात व परिसरात पाणी कमी पडल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा पाऊस तेव्हाच गावाकडे जायचे असे आम्ही ठरविले आहे.- भारती भोये (गोठ विहीर)३) मतदान प्रचारासाठी आलेले पुढारी मतदान झाल्यावर आमच्या अडचणी विसरून जातात, गावाकडे वीज फक्त चार तास राहते पिण्यासाठी पाणी नाही, टॅकर पोहोचायल रस्ते नाही अशी अवस्था असल्याने आम्हाला जगण्याचा पर्याय शोधावा लागतो आहे.- देवराम गालफ (बोरपाडा)