शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:55 IST

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

ठळक मुद्दे पेठ तालुक्यातील गावे लागली होरपळू; रोजगाराकरीता भटकंती सुरु

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

मातुलेस्वर पटांगनाचा, दुष्काळात जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात व आजूबाजूच्या परिसरात पेठ हरसूल या तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंब स्थलांतरित होताना दिसताहेत असेच मातोरी गावातील मातुलेस्वर पटांगणात गेल्या दहा बारा दिवसापासून राहत असलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असे समजले कि पेठ तालुक्यातील गोटविहीर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण गैरसोय असल्याने तेथील सुमारे दोनशे लोकांनी आपल्या कुटुंबासह गाव सोडण्याचा निर्णय घेतला, गावात पाणी नाही चार ते पाच किलोेमिटर वरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याने जगायचे कसे व कुटुंबाला जगवायचे कसे हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुटुंबाला घेऊन गावातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींनी गावातून काढता पाय घेत गावोगावी रोजंदारीवर काम करत उदरनिर्वाह करत आहेत.गावातील बहुतेक नागरिकांची मुले हि शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत परीक्षा संपून बहुतेक मुले सुट्यांमध्ये गावाकडे परतली आहेत, दरसाल सट्टीत मुलांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या मते मुले आश्रमशाळेतच सुखी होते. गावाकडे पाणी नसल्याने आपल्याबरोबरीने त्यांनाही गावोगावी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, आज मातोरीत दिवसभर मिळेल ते काम करून हि मंडळी आपले जगण्याचे साधन करत आहे.१) आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर दमण नदी आहे, पण गावात पाणीपुरवठा नाही. पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याने आम्ही आमची मुले घेऊन नाशिकला आलो आहोत.- संतोष भसरे (बोर पाडा)२) हंडाभर पाण्यासाठी खूप वनवन करायला लागत असल्याने खूप त्रास होतो, पूर्ण गावात व परिसरात पाणी कमी पडल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा पाऊस तेव्हाच गावाकडे जायचे असे आम्ही ठरविले आहे.- भारती भोये (गोठ विहीर)३) मतदान प्रचारासाठी आलेले पुढारी मतदान झाल्यावर आमच्या अडचणी विसरून जातात, गावाकडे वीज फक्त चार तास राहते पिण्यासाठी पाणी नाही, टॅकर पोहोचायल रस्ते नाही अशी अवस्था असल्याने आम्हाला जगण्याचा पर्याय शोधावा लागतो आहे.- देवराम गालफ (बोरपाडा)