शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

मनसे बदल

By किरण अग्रवाल | Updated: July 15, 2018 17:17 IST

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

नाशिककडे ‘मनसे’चा म्हणजे राज ठाकरे यांचा गड म्हणून पाहिले जाण्यासारखी स्थिती मध्यंतरी होती. शहरातले तीन आमदार ‘मनसे’चे होते. लोकसभेच्या निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मते या पक्षाला मिळाली होती, तर नाशिक महापालिकेतही तब्बल ४० नगरसेवक निवडून देत सत्ता भूषविण्याची संधी नाशिककरांनी दिली होती. परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे फारसे काही न घडल्याने व जे घडले त्यालाही विलंबच झाल्याने मतदारांनी सर्वच ठिकाणची सत्तेची सतरंजी खेचून घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या आघाडीवर शांतताच होती. राज ठाकरे यांचे नाशिक दौरेही कमी झाले, त्यामुळे पक्ष संघटनात्मक स्थितीही विकलांग झाली होती. महापालिकेतील सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यावर तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला होता. पक्ष स्थापनेनंतर नेमले गेलेल्या प्रकाश दायमा, संदीप पाटील व सचिन ठाकरे या पक्षाच्या तिघा जिल्हाध्यक्षांनी कालांतराने पक्षाला रामराम केला. त्यानंतरच्या सुदाम कोंबडे यांनीही अन्य पक्षाचा रस्ता धरला. शहराध्यक्षही निवांत होते. त्यामुळे या पक्षात कमालीचे हबकलेपण आले होते.

ठाकरे यांच्या अधूनमधूनच्या दौºयाप्रसंगी जरा सळसळ व्हायची, पुन्हा निस्तेजावस्था यायची. अशात गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांची नेमणूक केली गेली, तर शहराध्यक्षपदी अनिल मटाले यांच्या नेमणुकीला सहा महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी घोषित होऊ न शकलेल्या कार्यकारिणीलाही अखेर मुहूर्त लाभला व तब्बल पावणेतीनशेपेक्षा अधिक संख्येतील पदाधिकाºयांची घोषणा करण्यात आली. या प्रयत्नातून नाही काही तर किमान पक्ष संघटनात्मक पातळीवर नवनिर्माण घडून येण्याची अपेक्षा बाळगता येणारी आहे.

टॅग्स :Politicsराजकारण