शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

मनसे बदल

By किरण अग्रवाल | Updated: July 15, 2018 17:17 IST

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

नाशिककडे ‘मनसे’चा म्हणजे राज ठाकरे यांचा गड म्हणून पाहिले जाण्यासारखी स्थिती मध्यंतरी होती. शहरातले तीन आमदार ‘मनसे’चे होते. लोकसभेच्या निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मते या पक्षाला मिळाली होती, तर नाशिक महापालिकेतही तब्बल ४० नगरसेवक निवडून देत सत्ता भूषविण्याची संधी नाशिककरांनी दिली होती. परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे फारसे काही न घडल्याने व जे घडले त्यालाही विलंबच झाल्याने मतदारांनी सर्वच ठिकाणची सत्तेची सतरंजी खेचून घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या आघाडीवर शांतताच होती. राज ठाकरे यांचे नाशिक दौरेही कमी झाले, त्यामुळे पक्ष संघटनात्मक स्थितीही विकलांग झाली होती. महापालिकेतील सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यावर तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला होता. पक्ष स्थापनेनंतर नेमले गेलेल्या प्रकाश दायमा, संदीप पाटील व सचिन ठाकरे या पक्षाच्या तिघा जिल्हाध्यक्षांनी कालांतराने पक्षाला रामराम केला. त्यानंतरच्या सुदाम कोंबडे यांनीही अन्य पक्षाचा रस्ता धरला. शहराध्यक्षही निवांत होते. त्यामुळे या पक्षात कमालीचे हबकलेपण आले होते.

ठाकरे यांच्या अधूनमधूनच्या दौºयाप्रसंगी जरा सळसळ व्हायची, पुन्हा निस्तेजावस्था यायची. अशात गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांची नेमणूक केली गेली, तर शहराध्यक्षपदी अनिल मटाले यांच्या नेमणुकीला सहा महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी घोषित होऊ न शकलेल्या कार्यकारिणीलाही अखेर मुहूर्त लाभला व तब्बल पावणेतीनशेपेक्षा अधिक संख्येतील पदाधिकाºयांची घोषणा करण्यात आली. या प्रयत्नातून नाही काही तर किमान पक्ष संघटनात्मक पातळीवर नवनिर्माण घडून येण्याची अपेक्षा बाळगता येणारी आहे.

टॅग्स :Politicsराजकारण