शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मनसे बदल

By किरण अग्रवाल | Updated: July 15, 2018 17:17 IST

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.

नाशिककडे ‘मनसे’चा म्हणजे राज ठाकरे यांचा गड म्हणून पाहिले जाण्यासारखी स्थिती मध्यंतरी होती. शहरातले तीन आमदार ‘मनसे’चे होते. लोकसभेच्या निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मते या पक्षाला मिळाली होती, तर नाशिक महापालिकेतही तब्बल ४० नगरसेवक निवडून देत सत्ता भूषविण्याची संधी नाशिककरांनी दिली होती. परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे फारसे काही न घडल्याने व जे घडले त्यालाही विलंबच झाल्याने मतदारांनी सर्वच ठिकाणची सत्तेची सतरंजी खेचून घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या आघाडीवर शांतताच होती. राज ठाकरे यांचे नाशिक दौरेही कमी झाले, त्यामुळे पक्ष संघटनात्मक स्थितीही विकलांग झाली होती. महापालिकेतील सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यावर तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला होता. पक्ष स्थापनेनंतर नेमले गेलेल्या प्रकाश दायमा, संदीप पाटील व सचिन ठाकरे या पक्षाच्या तिघा जिल्हाध्यक्षांनी कालांतराने पक्षाला रामराम केला. त्यानंतरच्या सुदाम कोंबडे यांनीही अन्य पक्षाचा रस्ता धरला. शहराध्यक्षही निवांत होते. त्यामुळे या पक्षात कमालीचे हबकलेपण आले होते.

ठाकरे यांच्या अधूनमधूनच्या दौºयाप्रसंगी जरा सळसळ व्हायची, पुन्हा निस्तेजावस्था यायची. अशात गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांची नेमणूक केली गेली, तर शहराध्यक्षपदी अनिल मटाले यांच्या नेमणुकीला सहा महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी घोषित होऊ न शकलेल्या कार्यकारिणीलाही अखेर मुहूर्त लाभला व तब्बल पावणेतीनशेपेक्षा अधिक संख्येतील पदाधिकाºयांची घोषणा करण्यात आली. या प्रयत्नातून नाही काही तर किमान पक्ष संघटनात्मक पातळीवर नवनिर्माण घडून येण्याची अपेक्षा बाळगता येणारी आहे.

टॅग्स :Politicsराजकारण